Virender Sehwag

Virender Sehwag : वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियाऐवजी ‘या’ नावाने संघ खेळवा? वीरेंद्र सेहवागने BCCI कडे केली मागणी

660 0

भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर वीरेंद्र सेहवागने (Virendra Sehwag) केलेलं एक ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. सेहवागने ट्विट करत BCCI सचिव जय शाह यांच्याकडे एक मागणी केली आहे. पुढच्याच महिन्यात एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत टीम इंडियाचं नाव बदललं जावं असं सेहवगाने म्हटलं आहे. या स्पर्धेमधून टीम इंडिया ऐवजी भारत या नावाने मैदानात उतरावं असं सेहवागने ट्विट करत मागणी केली आहे.

ट्विटमध्ये सेहवागने पुढे म्हटलंय. मला नेहमीच विश्वास आहे की नाव असे असावे की ते आपल्यामध्ये अभिमान जागृत करेल. आपण भारतीय आहोत आणि इंडिया हे नाव ब्रिटिशांनी दिलं आहे. त्यामुळे इंडियाचं नाव बदललं गेलं पाहिजे. एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेत भारतीय खेळाडूंच्या जर्सीवरही भारत असं लिहिण्यात यावं अशी मागणीही सेहवागने आपल्या ट्विटमध्ये केली आहे. सध्या त्यांचे हे ट्विट मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

आतापर्यंत या संघांची नावं बदलली आहेत
आंतरराष्ट्रीय क्रिकट संघाचं नाव बदललण्याची ही पहिलीच वेळ नाही. याआधी नेदरलँड संघाचं नावही बदलण्यात आलं होतं. हा संघ आधी हॉलंड नावाने मैदानात उतरत होता. पण एक जानेवारी 2020 मध्ये या देशाने अधिकृतरित्या नेदरलँड नाव करुन घेतलं. सेहवगाने आपल्या ट्विटमध्ये नेदरलँड देशाचा दाखला दिला आहे. याशिवाय बर्मा देशाने आपलं नाव बदलून म्यानमार असे केले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!