नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने काल वेस्ट इंडिजविरुद्धची तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका 2-1 ने (IND Vs WI Odi Series) जिंकली आहे. भारताने तिसरा आणि निर्णायक सामना जिंकून ही मालिका (IND Vs WI Odi Series) आपल्या नावावर केली. हा सामना भारताने 200 धावांच्या फरकाने जिंकला आहे. या सामन्यात अनेक विश्वविक्रम नोंदवले गेले आहेत. विशेष म्हणजे रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारखे सिनिअर खेळाडू संघात नसतानादेखील भारताने ही मालिका जिंकली आहे.
तिसर्या वनडेत टीम इंडियाच्या सर्व खेळाडूंनी चांगली कामगिरी केली. इशान किशन, शुभमन गिल, हार्दिक पंड्या आणि संजू सॅमसन यांच्या तूफान फटकेबाजीने टीम इंडियाने 50 षटकांत 5 गडी गमावून 351 धावा केल्या. तर वेस्टइंडिजच्या संघाला गोलंदाजीच्या जोरावर 151 धावांवर ऑल आऊट केले. या मालिका विजयाबरोबर टीम इंडियाने 2 मोठे विक्रम आपल्या नावावर केले आहेत.
कालचा सामना त्रिनिदादच्या ब्रायन लारा क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारताने हा सामना 200 धावांनी जिंकला. कोणत्याही संघाने वेस्ट इंडिजविरुद्ध वेस्ट इंडिजमध्ये मिळेवलेला हा सर्वात मोठा विजय आहे. 2007 मध्ये एकदिवसीय सामन्यात वेस्ट इंडिजवर 186 धावांनी विजय मिळवणाऱ्या इंग्लंडचा विश्वविक्रम भारताने मोडला.अशाप्रकारे टीम इंडियाने आता वेस्ट इंडिजमध्ये नवा विश्वविक्रम रचला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये एकाच संघाविरुद्ध (IND Vs WI Odi Series) सर्वाधिक सलग द्विपक्षीय मालिका जिंकण्याचा विश्वविक्रम आता भारताच्या नावावर झाला आहे. भारतीय संघाने आता पाकिस्तानला मागे टाकत इंडिजविरुद्ध सलग 13 एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत, तर पाकिस्तानने झिम्बाब्वेविरुद्ध सलग 11 एकदिवसीय मालिका जिंकल्या आहेत.