“मेै समय हु!मे अनंत काल से चला आ रहा हु! मेै किसी के लिये नही रुका, हॉं मगर जो मेरे साथ चला है वह हमेशा कामयाब हुआ है!
खरंच हेच सत्य आहे आणि जो कोणी हे सत्य केवळ जाणारच नाही तर आपल्या जीवनात उतरवेल तोच खरा यशस्वी होईल वेळ खरंच कोणासाठी थांबत नाही पण जे कोणी त्याच्याबरोबर चालतात त्यांना तो थांबवत नाही.
मेै समय हु! हे वाक्य ऐकल्यापासूनच मला वेळेविषयी आकर्षण निर्माण झाले होते. अशी एकच बाब या पृथ्वीतलावर आहे जी आधी पण होती आजही आहे व पुढेही राहील भूतकाळातील प्रत्येक घटनेचा साक्षीदार म्हणून वेळेकडे पाहिले पाहिजे. वेळेनेच जगातील सर्व चांगल्या वाईट वेळा पाहिल्या आहेत. अगदी वेळेचे मोजमाप होण्याआधी पासूनच वेळ उपलब्ध होतीच जसे गुरुत्वाकर्षणाचा शोध लागण्यापूर्वीच गुरुत्वाकर्षण कार्यरत होते वेळही आपल्या गतीने पुढे चालली होती. घटना लढाया एवढेच काय तर महाप्रलय वादळ या सगळ्या गोष्टी या वेळेने फार जवळून पाहिले आहेत. पृथ्वीतलावरील व परगृहांवरील सर्व चांगला वाईट क्षणांचा काळ हा साक्षी आहे.त्यामुळे वेळेचे महत्व जपणे व तिच्या आपल्या जीवनात प्रगतीसाठी उपयोग करणे याविषयी माझी उत्सुकता वाढतच गेली.
वेळेचे आकर्षण वाटण्याचे अजून एक मुख्य कारण म्हणजे निसर्गाने वेळ वाटण्यातच काही भेदभाव केला नाही त्यांनी सर्वांनाच एक समान वेळ दिला आहे मग ते नुकतेच जन्मलेले बाळ असो वा 80 वर्षाचा वृद्ध शालेय विद्यार्थी असो वा एखाद्या देशाचे पंतप्रधान. निसर्गाने ना गरीब श्रीमंत असा भेदभाव केला ना त्याची पद प्रतिष्ठा बघितली ना पुरुष स्त्री असा फरक केला ना लहान थोर अशी विभागणी केली त्याने सर्वांवर रोज 24 तास अशी वेळेची उधळण केली या वेळेचा कसा विनियोग करायचा ही गोष्ट मात्र त्याने आपल्यावर सोपवली काही लोकांनी याचा फारच समर्पक वापर केला तर काहीजणांनी याची दखलही घेतली नाही निसर्गाने जरी सर्वांना एकसमान वेळ दिली असली तरी तिचा वापर वेगवेगळ्या करायची मुभा मनुष्याला दिली त्यामुळे वेळेचा सदुपयोग व दूर उपयोग व्हायला लागला.
या जगात वेळ देताना कोणाकडे किती काम आहे हे पाहून वेळ दिला जात नाही तसे असते तर एखाद्या देशाचे पंतप्रधानांना रोज 40 तास दिले गेले असते तर एखाद्या शाळकरी मुलाला चारच तास मिळाले असते पण असे होत नाही सर्वांना समानच वेळ मिळतो पण एका गोष्टीचे मात्र आश्चर्य वाटते की कोणी यात 24 तासात देश चालवतात आणि कोणाला याच 24 तासात घर चालवतानाही दम शाक होते यातून एक बात तर पक्की होते की वेळ सर्वांकडे सारखाच आहे मला किंवा कोणालाच तो कमी जास्त मिळालेला नाही पण त्याचा वापर करण्याची प्रत्येकाची पद्धत मात्र वेगळी आहे आणि त्यामुळे त्यातून मिळणारा मोबदलाही निश्चितच वेगळा असतो त्यामुळे या 24 तासात काही जणांनी जग जिंकले तर काहीजण होते तेही हरवून बसले आता हे आपल्याला ठरवायचे आहे की आपण कोणाच्या पंगतीला जाऊन बसणार.
हो, वेळ असेल तर पैसा कमवता येईल. पण पैशाने वेळ खरेदी करता येत नाही. गेलेली वेळ परत नाही. त्यामुळेच पैशापेक्षाही श्रेष्ठ ठरतो तो म्हणजे तुमचा वेळ. त्यामुळे वेळेला किती महत्व द्यायचे ते जाणून घ्या.
शून्य मिनिटे -आता काय ?
याची प्रेरणा मला आमच्या गावाकडून मिळाली.मी तेथील लोकांकडून शून्य मिनिटाचे नियोजन करायला शिकले आमच्या गावाकडे कोणीही विचारले की हे काम कधी करणार तर त्यांचे ठरलेले उत्तर असते ते म्हणजे शून्य मिनिटात हे म्हटल्यावर त्यांना ते काम करायला दोन तास का लागेना पण त्यांची शून्य मिनिटे काही संपत नाही आत्मविश्वासही कमी होत नाही पुढच्या वेळेला ही शून्य मिनिटे म्हणायला मोकळे. मी विचार केला की जर यांची सगळे कामे 0 मिनिटात होत असतील तर मला हे लेख लिहिणे 0 मिनिटात का जमणार नाही ही शून्य मिनिटे मी शोधायला सुरुवात केली याला मी माझ्या सोयीसाठी नाव दिले आता काय जेव्हा जेव्हा मला हा प्रश्न पडायचा की आता पुढे काय करायचे तेव्हा मी म्हणायचे की आता शून्य मिनिटांचा वेळ सुरू झाला आहे व त्या प्रश्नाचे उत्तर मिळाले की शून्य मिनिटे संपली.
उदाहरणार्थ आत्ता मी घरी आले चहा होत आहे आणि चहा होईपर्यंत माझ्या मनात विचार आला की आता काय करायचे तर तो शून्य मिनिटांचा काळ जेव्हा मला कोणाचा फोन आला आणि एखाद्या विषयावर आम्हाला निर्णय घ्यायचा आहे तेव्हा ते म्हणाले पाच मिनिटे थांबा मी तुम्हाला विचार करून सांगतो किंवा कोणाला विचारून सांगतो तेव्हा शून्य मिनिटांचा वेळ सुरू फोन ठेवल्यापासून ते पुन्हा फोन येईपर्यंत शून्य मिनिटे वेळ सुरू मला शून्य मिनिटे सापडायला लागली दोन-चार दिवसातच मला कळाले की शून्य मिनिटे भरपूर आहेत जेवायला बसल्यावर ताट येईपर्यंतचा वेळ म्हणजे शून्य मिनिटे लिफ्टने बटन दाबल्यापासून ते लिफ्ट येईपर्यंत वेळ म्हणजे शून्य मिनिटे मला तर खजिना सापडला आता फक्त हा खजिना वापरायची गरज होती.
(लेख : दीपाली गुंजाळ)