माळीण दुर्घटनेला 8 वर्ष पूर्ण ; एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं

313 0

दुभंगली धरणीमाता कोपलं आभाळ गेले सोडून जीवाभावाचे मैतर युगायुगाच

माळीण दुर्घटना : 30 जुलै 2014 तो भयाण दिवस याच दिवशी होत्याचं नव्हतं झालं माळीण गावावर पहाटे काळरुपी डोंगर कोसळला अन् काहीच क्षणात होत्याचं नव्हतं. पुणे जिल्ह्यातील माळीण गाव डोंगराखाली गाडलं गेलं, त्याला आज आठ वर्ष लोटली .

माळीण दुर्घटना: ६ वर्ष पूर्ण, आपण काय धडा घेतला?

आंबेगाव तालुक्यातल्या माळीण गावावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला. पहाटे तीनच्या सुमारास गावकरी गाढ झोपेत असतानाच, काळानं गावावर घाला घातला. डोंगरकडा कोसळून त्याखाली जवळपास 44 घरं जागीच गाडली गेली होती. आणि सुमारे 725 वस्तीचं हे गाव होत्याचं नव्हतं झालं.

माळीण दुर्घटना: ६ वर्ष पूर्ण, आपण काय धडा घेतला?

डिंभे धरणामुळं विस्थापित झालेल्या लोकांचं पुनवर्सन माळीण गावात करण्यात आलं होतं. प्रामुख्यानं आदिवासी शेतक-यांची घरं गावात होती. पण निसर्गाचा कोप झाला आणि हे गाव डोंगराखाली गाडलं गेलं. केवळ घरं आणि माणसंच नाहीत, तर जनावरं आणि गावचं मंदिर देखील या आपत्तीमध्ये उद्धवस्त झालं.

सरकारी असंवेदशीलतेचे खून | तळीये - सुतारवाडी व्हाया माळीण | Navarashtra  (नवराष्ट्र)

हिरव्यागार निसर्गाच्या कुशीत वसलेलं माळीण गाव… कायमचं काळाच्या उदरात गडप झालंय. आता उरलीय ती फक्त चिखलमाती… अशीच परिस्थिती आजपासून बरोबर 8 वर्षांपूर्वी निर्माण झाली होती.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!