पुणे : काही वर्षांपूर्वी झालेल्या पहाटेच्या शपथविधीनंतर पुन्हा एकदा अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादीला मोठा धक्का दिला आहे. मात्र यावेळी त्यांनी सकाळी नव्हे तर दुपारी शपथ घेतली. शरद पवार (Sharad Pawar) यांनी भाकरी फिरवण्याचं वक्तव्य करत तशी कृतीही केलेली असताना अजित पवार यांनी 8 आमदारांसह पक्षांतर्गत बंड केलं.
या दौऱ्यानंतर शरद पवार हे अॅक्शन मोडवर आले आहेत. सोमवारी (आज) शरद पवार सातारा दौऱ्यावर जात असून, तिथून ते या लढ्याचं नेतृत्त्वं करताना दिसणार आहेत. खुद्द पवारांनीच रविवारच्या पत्रकार परिषदेमध्ये आपल्या या कार्यक्रमाबद्दल सांगितले. साताऱ्यातील कराड येथे शरद पवार त्यांच्या दौऱ्यादरम्यान, यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या समाधीस्थळाला भेट देऊन तिथूनच एका नव्या राजकीय लढाईचं रणशिंग फुंकणार आहेत. यामुळे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष पवारांच्या या दौऱ्याकडे लागून राहिले आहे.
Ajit Pawar : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवारांकडे किती आमदार शिल्लक ? पहिला आकडा आला समोर
कसा असेल शरद पवार यांचा सातारा दौरा?
सकाळी 8 वाजता पुण्याहून निघणार
11 वाजता कराडमध्ये पोहोचणार
11 ते 11.30 दरम्यान, यशवंतराव चव्हाण समाधीस्थळावर दर्शन
11.15 वाजता कराडहून निघणार
दुपारी 12 ते 1 दरम्यान रयत शिक्षण संस्थेची बैठक
1 ते 1.45 दरम्यान विश्रांती
दुपारी 2 वाजता पश्चिम महाराष्ट्र मातंग परिषदेला हजेरी
साधारण 3.30 वाजता साताऱ्याहून परतीचा प्रवास
रात्री 8 .30 दरम्यान मुंबईत आगमन.
Maharashta Politics : ‘या’ 6 काका-पुतण्यांच्या जोड्या ज्यांनी दिलं महाराष्टाच्या राजकारणाला नवे वळण
शरद पवारांनी घेतला आक्रमक पवित्रा
राष्ट्रवादीतील बंडानंतर शरद पवारांनी (Sharad Pawar) आक्रमक पवित्रा घेतला आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्यासह 9 मंत्र्यांवर कारवाईचा इशाराही पवारांनी दिला आहे. आपण न्यायालयीन लढा लढणार नाही, तर राज्यातील जनतेसमोर जाणार असे स्पष्ट करत जनतेलाही त्यांनी महत्त्वाचा संदेश आणि बंडखोरांना इशाराच दिला आहे. इतकंच नव्हे तर महाविकास आघाडी म्हणून यापुढे आक्रमक पद्धतीने काम करणार असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.