सासवड : सासवड नगरपालिकेच्या (Saswad Municipality) कार्यक्षेत्रात सोपान नगर रोड वर सकाळी ९वाजता एका इमारतीला आग लागली होती ही आग विझवण्यासाठी आपल्या नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी आली नाही. जेजुरी नगरपरिषदेच्या गाडीने आग विझविली जाण्या अगोदर सर्व मालमत्तेचे नुकसान झाले होते. नगरपालिकेची गाडी जर दुरुस्ती साठी गेली असेल तर पर्यायी व्यवस्था का करण्यात आली नाही ?
जेजुरी नगरपालिकेकडे दोन अग्निशामक गाड्या आहेत तर पर्याय म्हणून तात्पुरती एक गाडी सासवड साठी का आणली नाही ? लोक प्रतिनिधींच्या MSEB उपोषणासाठी जर जेजुरी नगरपालिकेचे स्वच्छ्ता गृह सासवड नगरपालिकेने स्वतः च्या आवारात मांडले होते तर अग्निशामक गाडी एक दोन दिवसासाठी चालली नसती काय ?
सुशोभीकरण रंग रांगोटी(सोपान नगर पुरते),विद्युत रोषणाई (नगरपालिका परिसर पुरती), सर्वत्र स्वछतेचे बक्षीस मिळण्यासाठी लावलेले मुरल व त्यासाठी लाखो रुपयांचा चुराडा खूप झाला .आता लोकांच्या अडचणी कडे लक्ष द्या अशा प्रकारे सर्व मालमत्तेची राख रांगोळी होई पर्यंत आपली गाडी आग लागली तेथपर्यंत जात नाही ही शोकांतिका आहे आणि हे आज पर्यंत बऱ्याच आगी सासवड मध्ये लागल्यावर घडलेले आहे . नागरिकांना सुरक्षित वाटत नाही . जीवित व मालमत्तेची सुरक्षितता वाटत नाही .वाढती गुन्हेगारी, अवैध व्यवसाय,बेधुंद वाहतूक,सार्वजनिक रस्त्यांची नियमित रेषा नसणे, कोणत्याही इमारतीवर नियंत्रण नाही,जलनि:सारणाचा बोजवारा उडालेला,अनियमित पाणी पुरवठा,सार्वजनिक सुरक्षितता नाही,अपुरी पोलीस यंत्रणा, डास नियंत्रण नाही.हे जर होत नसेल तर नगरपालिकेची कार्य आणि कर्तव्य काय ? टॅक्स गोळा करणे, helmet च्या पावत्या करणे ,पाणी पट्टी ,इन्कम टॅक्स,प्रोफेशनल टॅक्स,GST, आणि किती तरी टॅक्स त्या बदल्यात नागरिकांना काय मिळते ? याचा विचार झाला पाहिजे.
प्रशासन घेणाऱ्या निर्णयात अथवा निवडून गेलेले प्रतिनिधींच्या निर्णयात जनतेचा सहभाग नसतो ही या लोकशाहीची मोठी शोकांतिका आहे. लोक आपल्या हक्कांसाठी लढा देत नाहीत. या आज लागलेल्या आगीची चौकशी करून महाराष्ट्र नगरपालिका व नगरपंचायती अधिनियम 1966 च्या कलम 228अन्वये जिल्हा दंडाधिकारी व महाराष्ट्र शासनाच्या अग्निशमन सल्लागार यांचेकडे सादर करावा ही विनंती. या घटनेचा अहवाल प्रसिद्ध करून दोषी अधिकारी व कर्मचारी यांच्यावर कारवाई करण्यात यावी ही विनंती.