PUNE WATER DAM INCREASE: मे महिन्याच्या अखेरीस वरुणराजाची जोरदार हजेरी पाहायला मिळत असून यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा आहे.
PUNE WATER DAM INCREASE | पुणेकरांसाठी खुशखबर! पाणीकपातीचं संकट टळणार
खडकवासला धरण साखळी प्रकल्पात पाणी पातळीत वाढ झाल्यानं पुणेकरांचं पाणी कपातीचे संकट टळणार आहे. PUNE WATER DAM INCREASE:
खडकवासला धरण साखळी प्रकल्पात सोमवारी रात्री मुसळधार पाऊस झाला या पावसानं खडकवासला 16 मिमी, टेमघर 70 मिमी, वरसगाव 92 मिमी, पानशेत धरणाच्या पाणलोट क्षेत्रात 99 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
BEED TRUCK ACCIDENT:बीड जिल्हा अपघातानं हादरला एका अपघातातून बचावले अन् दुसऱ्या अपघाताने घेतला बळी
या चारही धरणांमध्ये सुमारे 28 एमएलडी पाण्याची वाढ झाली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आल्याने पुणेकरांवर असणार पाणी कपातीचं संकट टळणार आहे. शहरात तसेच धरणांच्या पाणलोट क्षेत्रात दरवर्षी मे महिन्यात पूर्वमोसमी पाऊस होत असला तरी, उन्हाळ्यामुळे जमीन तापल्याने तसेच पावसाचे प्रमाण कमी असल्याने प्रत्यक्षात मान्सूनच्या आगमनानंतरच धरणांमधे पाणीसाठ्यास सुरुवात होते.
सर्वसाधरणपणे जूनच्या अखेरीस पाणीसाठा वाढण्यास सुरुवात होते.
मात्र, यंदा मे महिन्यातच या चारही धरणांत 150 मिमी पेक्षा अधिक पाऊस झाल्याने 26 मे पासूनच पाणीसाठा वाढण्यास सुरुवात झाली आहे.
रविवारी सायंकाळी या चारही धरणांचा पाणीसाठा 5.66 टीएमसी होता. तर दिवसभरात महापालिकेचा शहराचा पाणी पुरवठा तसेच कालव्यातून दिवसभर पाणी सोडण्यात आल्यानंतरही हा पाणीसाठा 5.70 टीएमसी झाला आहे.
त्यामुळे आता या पुढे धरणात येणारे पाणी वाढतच जाणार आहे.