Pune News

Pune News : ‘जनशक्ती’चे साखर संकुलात घुसून आंदोलन; साखर आयुक्तांच्या खुर्चीचा केला लिलाव

507 0

पुणे : ऊस कारखान्यांचा गळीत हंगाम संपून पाच महिने झाले आहेत. अशातच आता दुसऱ्या हंगामाची (Pune News) तयारी सुरु होण्याच्या मार्गावर आहे. परंतु आजतागायत साखर कारखानदारांकडून शेतकऱ्यांना थकीत ऊस बिले देण्यात आली नसल्याचा प्रकार समोर आला आहे. दिग्विजय बागल यांच्याकडे असणारा मकाई सहकारी साखर कारखाना भिलारवाडी, रणजित शिंदे यांच्याकडे असणारा कमलाई साखर कारखाना करमाळा या साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकीत ऊस बिले ऊस उत्पादकांना दिली नसल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.

कारखानदारांनी हजारो शेतकऱ्यांवर बोगस कर्ज काढली आहेत. शेकडो वाहन मालकांवर कर्ज काढली आहेत. बऱ्यापैकी कामगारांचा पगार देखील थकवला आहे. ऐन पावसाळी हंगाम असताना दुष्काळ सदृश परिस्थिती असताना कारखान्यांकडून शेतकऱ्यांची पिळवणूक होत आहे. शेतकरी आत्महत्येसारखा पर्याय निवडत आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे. या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेने थेट साखर संकुलाच्या गेटमध्ये घुसून आंदोलन केले आहे.

या साखर कारखानदारांनी शेतकऱ्यांची थकीत बिले लवकर अदा करावी यासाठी जनशक्ती शेतकरी संघटनेने साखर आयुक्त व सरकारला पत्र देऊन 5 सप्टेंबरचा अल्टिमेटम दिला होता. त्यानुसार जनशक्ती संघटनेने साखर संकुलाच्या गेटमध्ये घुसून आंदोलन केले. साखर आयुक्ताच्या खुर्चीचा लिलाव करून येणारी रक्कम ही साखर आयुक्त व कारखान्याच्या चेअरमनला पाठवली जाणार आहे. या आंदोलनाला शेतकरी नेते अतुल खूपसे , बाळासाहेब सानप व इतर शेतकरी उपस्थित होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!