पुणे : पतित पावन संघटना आणि शनिवार वाडा चौक मित्र मंडळ आयोजित एक पणती पुण्येश्वरासाठी हा दिपोत्सव भाजपाचे माजी राष्ट्रीय सचिव आणि आंध्रप्रदेशचे सहप्रभारी माननीय श्री सुनीलजी देवधर यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्याचे ग्रामदैवत श्री कसबा गणपती येथे संपन्न झाला त्यावेळी श्री नंदकुमार एकबोटे, आर पी आय आठवले गट चे राष्ट्रीय निमंत्रक श्री मंदार जोशी, श्री धनंजय गायकवाड, श्री आशिष कांटे व सर्व हिंदुत्ववादी संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
त्यावेळी श्री नंदकुमार एकबोटे यांनी पुण्येश्वर मंदिराच्या बाबत सर्व इतिहास सांगितला व त्यापुढे सुनीलजी बोलताना म्हणाले ज्याप्रमाणें कोट्यवधी भारतीयांनी संकल्प केला व त्याप्रमाणे कृती केली व त्यामुळे अयोध्येत प्रभू श्रीरामांचे भव्य मंदिर उभारले गेले त्याचप्रमाणें जर लाखो पुणेकरांनी संकल्प केला तर पुण्येश्वराचे मंदिर देखील उभे राहू शकेल,आज पर्यंत पुण्याने देशाला खूप काही दिले आहे आता देशाने पुण्याला द्यायची वेळ आलेली आहे. प्रसार माध्यमातून पुण्यश्वराचे प्रबोधन होणे खूप गरजेचे आहे यासाठी समस्त पुणेकरांनी पुढाकार घ्यावा.
आपण जय पुण्येश्वराचा जागर करत पुण्यामध्ये स्वाक्षरी मोहीम राबविने गरजेचे आहे. पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी हे नक्कीच आपल्या पुण्यासाठी कटीबुद्ध आहेत असे श्री सुनील जी देवधर यांनी सांगितले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्रीहर्ष सगरे यांनी इस्त्रायल राष्ट्रनिर्मितीचे उदाहरण दिले व जर संपूर्ण समाजाने एक ध्येय ठेवून त्या प्रमाणे वाटचाल केली तर अशक्य कार्यही शक्य होते असे सांगितले. प्रमुख पाहुण्यांचा परिचय स्वप्नील नाईक व सौरभ कर्डे यांनी करुन दिला. कार्यक्रमाचा समारोप व आभार प्रदर्शन सुनील तांबट यांनी केले.या कार्यक्रमाचे आयोजन श्री स्वप्निल नाईक, श्री सुनील तांबट, श्री जितेंद्र निजामपूरकर व श्री योगेश वाडेकर यांनी केले होते.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.