पुणे:महानगरपालिकेकडून शहरात 4 जुलै ते 11 जुलै पर्यंत एक दिवसाआड पाणी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता.या निर्णयामध्ये आता बदल करण्यात आला असून 8 जुलै ते 11 जुलै पर्यंत पुणे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.
आषाढी एकादशी आणि बकरी ईद असल्यामुळे शहरात दररोज पाणी पुरवठा करण्यात येणार असल्यामुळे,या तीन दिवशी पाणी कपात रद्द करण्यात आली आहे.11 जुलै नंतर धरणातील पाणीसाठा पाहता पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.अशी माहिती पुणे महानगरपालिका पाणीपुरवठा विभागाच्या वतीने देण्यात आली आहे.