पुणे : सध्या जोरदार पावसामुळे धरणे तुडुंब भरली आहेत. त्यामुळे पुणेकरांच्या पाण्याचा प्रश्न तर मिटला आहे. परंतु सध्या धरणातून येणाऱ्या पाण्यामध्ये गढूळपणा वाढला आहे.
महापालिकेच्या वतीने जलशुद्धीकरण केंद्रातून पाणी शुद्ध करण्यात येत आहे,आणि ते पिण्यासाठी पूर्णपणे योग्य असल्याचे देखील महानगरपालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
तथापि पावसाळा आणि आरोग्याची खबरदारी घेण्याच्या हेतूने नागरिकांनी पाणी उकळून आणि गाळून प्यावे असे आवाहन पुणे महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.