पुणे : आज पुण्यामध्ये (Pune News) उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरीय गणेशोत्सव नियोजन आढावा बैठक पार पडली. या बैठकीनंतर अजित पवारांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पत्रकारांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. चला तर मग जाणून घेऊया अजित पवार काय म्हणाले…
आजची बैठीक उत्तम पार पडली. पोलीस प्रशासन काळजी घेत आहेत. मेट्रो प्रवास मी पण केला त्यात एवढं सांगायचे आहे लवकर मेट्रो सुरू करा अस सागितले होते,सहा ला सुरू होऊन रात्री 12 पर्यत मेट्रो सुरू करण्याच्या सूचना गणेशोत्सव काळात केल्या आहेत. पालकमंत्री सोबत बैठक,तुम्ही काहीही अंदाज व्यक्त करता,मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सगळे खेळीमेळीने काम करत आहेत,राज्याच्या कामासाठी काम करत आहोत,मुद्दाहून काही होत नाही.
ऑन छगन भुजबळ
अजित पवार यांना भाषण ऐकायला आलं नाही,माईक सिस्टीम मुळे,नंतर पूढे येत असताना सोसियल मीडियावर त्या बातम्या पाहिल्या नंतर माझा फोन झाला नाही,अनेक कार्यक्रम जास्त आहेत,त्यामुळे नाही बोलता आलं,राजकीय जीवनात आपलं भूमिका मांडत असताना कोणाच्या भावना दुखवो नये याचा प्रयत्न केला पाहिजे. अनेकदा टीका करताना वेगवेगळ्या प्राण्यांच्या नावाने टीका होते,सगळ्यांनी काळजी घेतली पाहिजे,
ऑन अजित पवार राष्ट्रीय अध्यक्ष
माझ्या सहकार्यने राष्ट्रीय अध्यक्ष केलं मग तुला काय अडचण आहे. सगळ्या वृत्तपत्राने माझा उदोउदो करावं असं नाही. लोकांनी केलेल्या मागण्या पूर्ण करण्याच्या मुख्यमंत्री आणि आम्ही करणार आहोत. मला शिवाजी महाराज आदर्श ठेवून,शाहू फुले आबेडकर विचार घेऊन पुढे जात आहे. 2019 ला सरकार आलं त्यावेळी सगळे डाव्या विचाराचे होते का,आपण देशाच्या भविष्यासाठी करतो त्यावेळेस वादाचे विषय घेत नाही.
ऑन दुष्काळ
दुष्काळ बाबत बैठक झाली त्यावर अनेक सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. मी बैठका घेतली तर सात दिवस परिणाम होतो त्यांनी घेतल्या तर दोन महिने परिणाम होत असेल
ऑन नरेंद्र मोदी
नरेंद्र मोदी ज्या प्रकारे काम करतात निर्णय घेतात,जगात अर्थव्यवस्था बदलली आहे,त्याच्या नेतृत्वाखाली देशात काम सुरू आहेत रस्ते रेल्वेची,त्याचा अभिमान आहे,लवकर उठून ते काम करतात,तातडीने कामा लागतात,मला माझं मन सांगत की त्याच्यासारखी व्यक्ती कोणी नाहीत. मला काहीही प्रश्न विचारून अडचणीत आणू नका,सगळ्याचा एक काळ असतो त्याकाळी पवार साहेब यांनी काम केलं
ऑन नितिन देसाई आत्महत्या प्रकरण
नितीन देसाई आत्महत्या प्रकरण तपास करायला सांगितले आहेत. नितीन देसाई सारखे लोक परत परत जन्माला येत नसतात
ऑन नगर घटना
कायदा कोणीही हातात घेऊ नये,पोलीस यंत्रणा लक्ष घातलं पाहिजे. आरोपी अटक आहेत,गुन्हा दाखल आहे.