महाराष्ट्र्र : आधी शिवसेनेने भाजपशी काडीमोड घेऊन आघाडी सरकार स्थापन केले. आता राज्यातील ऐतिहासिक बंड होऊन एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून राज्याला शिंदे-फडणवीस सरकार मिळाले. परंतु मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आपल्या पदाची सूत्रे हातात घेऊन बरीच दिवस होऊनही मंत्रिमंडळाचा विस्तार अद्याप झालेला नाही. एव्हाना विस्तार केव्हा होणार हे देखील स्पष्ट करण्यात येत नाहीये.
त्यातच महाराष्ट्रातील पावसाच्या तांडवाने जनता हैराण असताना शिंदे फडणवीस दोघेच फक्त राज्य चालवत आहेत अशी टीका विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केली आहे. काही दिवसापूर्वी पत्रकार परिषद सुरू असताना मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित होते. दरम्यान पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारलेल्या एका प्रश्नाचे उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट मुख्यमंत्र्यांच्या समोरचा माईकच उचलून घेतला, त्यांच्या या कृतीची राजकीय आणि अ-राजकीय क्षेत्रातून मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात येते आहे.
आपल्या सडेतोड भाषेसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खासदार संजय राऊत यांनी देखील पुन्हा एकदा शिंदे-फडणवीस सरकारवर कटू भाषेत टीका केली आहे. यावेळी संजय राऊत म्हणाले की,हे घटकेच राज्य सहा महिने टिकले तर नशीब,असे म्हणत “आज माइक ओढत आहेत,उद्या पॅन्ट उडून नागडं करतील”…! आज जे बंडखोर आहेत यांना यापुढे राजकीय आयुष्य नाही. अशी देखील घणाघाती टीका संजय राऊत त्यांनी केली आहे.