मुंबई : शनिवारी मुंबईमध्ये महाराष्ट्रातील सध्याच्या प्रमुख प्रश्ना बाबत विरोधी पक्षाच्या वतीने मोर्चा काढण्यात येणार आहे. परंतु हा विरोधी पक्षाचा मोर्चा नसून महाराष्ट्र प्रेमींचा मोर्चा असल्याच संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे या मोर्चामध्ये महाराष्ट्र प्रेमींसह सरकारमधील लोकांनी ही सहभागी व्हावं असं आवाहन संजय राऊत यांनी केलं.
सध्या महाराष्ट्रातील वातावरण प्रचंड तापलेले आहे. यामध्ये महापुरुषांचा अवमान, महाराष्ट्र बाहेर जाणारे उद्योग व्यवसाय, महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद प्रश्न यामुळे विरोधी पक्षाच्या वतीने उद्या निघणाऱ्या मोर्चासाठी परवानगी मागण्यात आलेल्या परवानगीला हिरवकंदील मिळतो का ? असा प्रश्न होता. परंतु आताच मिळालेल्या माहिती नुसार, मुंबई पोलिसांनी या मोर्चाला अखेर परवानगी दिली आहे.