मुंबई : एकनाथ शिंदे यांची बंडखोरी , त्यानंतर घडलेले सत्ता नाट्य … यामुळे महाराष्ट्रात रोजच काहीतरी राजकीय डावपेच सुरूच असतात . असं असताना शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला एक मुलाखत दिली आहे. या मुलाखतीवरून रोजच काही ना काही टीकाटिप्पणी होत आहे .
या मुलाखतीचा दुसरा भाग आज प्रसिद्ध झाला . आजच्या मुलाखतीमध्ये त्यांनी शिंदे गटातील आमदारांची एक मागणी मान्य केली आहे. “आम्हाला बंडखोर म्हणू नका , आम्ही बंडखोरी केलेली नाही” आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यासाठी आणि बाळासाहेबांचा विचार पुढे नेण्यासाठी लढतोय , असे शिंदे गटातील आमदारांचं म्हणणं आहे .
यावरच आता उद्धव ठाकरे यांनी या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की , “आता मी त्यांना ‘बंडखोर’ म्हणत नाही ,तर ‘विश्वासघातकी’ म्हणतोय”… ! विशेष म्हणजे या संपूर्ण मुलाखतीमध्ये देखील त्यांनी या आमदारांसाठी विश्वासघातकी असाच उल्लेख केला आहे .