“…तर हा एकनाथ शिंदे राजकारण सोडून जाईल…!” विरोधकांच्या टीकेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे थेट आव्हान

228 0

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह संपूर्ण गटाने आज जोरदार शक्ती प्रदर्शन केल आहे. सातत्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिंदे गटातील सर्व आमदार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाटिप्पणी केली जाते आहे. एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील आपल्या शक्ती प्रदर्शनादरम्यान आव्हानात्मक भाषण केला आहे.

यावेळी त्यांनी संजय राऊत आणि टीकाटिप्पणी करणाऱ्या विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. ” मी किती काळ आहे, हे तुम्ही ठरवणारे कोण ?”असा सवाल मुख्यमंत्री यांनी करून “त्याची चिंता जनता करेल, जनतेने त्यांचा निर्णय केला आहे. सुप्रीम कोर्टाने त्यांच्या ४ मागण्या फेटाळल्या आहेत. त्यांना कोर्टाने पळवून लावल आहे. आणि इकडे बोलतात आम्ही जिंकलो…, अरे तुम्हाला तोंड लपवून पळावे लागला आहे. तरी सुद्धा जिंकलो आम्ही… ,आणि फटाके हे वाजवत आहेत. हसावं की रडावं हे कळेना”असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लगावला आहे.

दरम्यान आमच्यावर यांनी वाटेल त्या शब्दात टीका केली. मात्र देवीने कुणाचा बळी घेतला हे आपण पाहिला आहे. त्यामुळे आता काहीही बोलत आहेत.आता बोलत आहेत यातला एकही निवडून येणार नाही… ,पण मी सांगतो यातला एकही माणूस पराभूत होणार नाही…! “एकही माणूस पराभूत झाला तर हा एकनाथ शिंदे राजकारण सोडून जाईल” असे थेट आव्हानचं एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना दिले आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!