मुंबई : इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी अनेक नेते मुंबईत दाखल झाले आहेत. इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी 28 पक्षांनी हजेरी लावली आहे. राहुल गांधी (Rahul Gandhi), सोनिया गांधी हे सुद्धा बैठकीसाठी दाखल झाले आहेत. या बैठकीच्या अगोदर राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली. या परिषदेमध्ये ते अदानींच्या मुद्द्यावरून आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. यासोबत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरदेखील जोरदार टीका केली आहे.
