Maharashtra Political Crisis

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणावर सचिन गोस्वामींची ‘ती’ पोस्ट व्हायरल…

301 0

मुंबई : काल राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी काही आमदारांसह बंड करून शिंदे – फडणवीस सरकारला पाठिंबा (Maharashtra Political Crisis) दर्शवून उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली. एकनाथ शिंदे यांच्याप्रमाणे अजित पवार यांनीही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या ताब्यात घेण्याची तयारी केली असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता कलाकारांनी आपले मत मांडायला सुरुवात केली आहे. तेजस्विनी पंडित, स्वप्नील जोशी यांनी आपले मत व्यक्त केल्यानंतर आता महाराष्ट्राची हास्यजत्रा शोचे लेखक सचिन गोस्वामींनी यावर आपले मत व्यक्त केले आहे.

Sharad Pawar : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार अ‍ॅक्शन मोडमध्ये; खेळली पहिली चाल

काय म्हणाले सचिन गोस्वामी?
‘महाराष्ट्रात सर्व पक्षीय राजवट.. भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपातील काँग्रेसी नेते एकत्र येऊन महाराष्ट्र घडवणार. (मतदारांची ऐशी तैशी..नैतिकतेच्या आईचा घो….)’ सध्या सचिन यांच्या या पोस्टवर मोठ्या प्रमाणात नेटकरी कमेन्ट करत असून ही पोस्ट शेअरही करत आहेत.

कालच्या या बंडामुळे राज्यात शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी अशा तीन पक्षाचं सरकार तयार झालं आहे. या सरकारमध्ये अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धर्माराव अत्राम, धनजंय मुंडे, आदिती तडकरे, संजय बनसोडे, अनिल पाटील या आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. तसेच येत्या काही दिवसांत मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!