छत्रपती संभाजीनगर : आगामी काळात होत असलेल्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने (Maharashtra Politics) सर्वच पक्षाने तयारी सुरु केली आहे.महाविकास आघाडीत गेल्या काही दिवसांपासून जागा वाटपाची चर्चा सुरु आहे. यावरून शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी महाविकास आघाडीला टोला लगावला आहे.
काय म्हणाले संजय शिरसाट ?
ही आघाडी कधीही होणार नाही. ते वंचितलाही बरोबर घेत नाहीत. राजू शेट्टींदेखील बरोबर घेत नाही. आता काँग्रेस देखील त्यांच्याबरोबर युतीमध्ये लढायला तयार नाही. हे सगळे जे स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट एखादा यांचा प्रवक्ता म्हणजे उभाठा गटाचा देतो. त्यावरती हे सगळे चालू आहे. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की, ही आघाडी होणारच नाही हे माझं ठाम मत आहे. इंडिया आघाडीचा प्रश्न येतच नाही आणि महाराष्ट्रात सुद्धा आघाडी होणार नाही. तुम्ही 26-27 तारखेपर्यंत वाट पाहा आणि मग तुम्हालाच कळेल की युती कशी होते, असे सूचक वक्तव्य शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केले आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Beed Crime : शरद पवार गटाच्या नेत्याची पेट्रोल टाकून गाडी जाळली; Video आला समोर
Ind Vs Eng : रविचंद्रन अश्विनने रचला इतिहास; इंग्लंडविरुद्ध केले ‘हे’ ‘अनोखं शतक’
Sanket Bhosle Murder Case : संकेत भोसले हत्या प्रकरणी मुख्य आरोपी कैलास धोत्रेला अटक
Lasya Nandita : धक्कादायक ! भीषण अपघातात ‘या’ तरुण महिला आमदाराचा मृत्यू
Rajendra Patni : कारंजाचे आमदार राजेंद्र पाटणी यांचे निधन