मुंबई : लोकसभा निवडणुकीचा (Loksabha) सातवा आणि शेवटचा टप्पा बाकी आहे. 1 तारखेला शेवटच्या टप्प्यात मतदान होणार असून 4 तारखेला निकाल लागणार आहे. राज्यात भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस लोकसभेत एकत्र लढले होते. आता विधानसभेसाठीही हे तीन पक्ष एकत्र निवडणूक लढवणार आहेत. लोकसभेच्या निकालानंतरच महायुतीची विधानसभेची रणनीती ठरणार आहे. आता महायुतीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार हे कसे ठरणार जाणून घेऊया….
पक्षाच्या स्ट्राईक रेटवर जागावाटप
ज्या पक्षाचा लोकसभेत स्ट्राइक रेट चांगला त्या पक्षालाच विधानसभेत जास्तीच्या जागा मिळणार, त्यामुळे कुणाला किती जागा सोडायच्या हे राज्यातील लोकसभा निकालावर ठरणार आहे. जिंकून येणे हे एकमेव धोरण डोळ्यासमोर असल्यानेच विधानसभेसाठी लोकसभा निवडणुकीचा स्ट्राईक रेट महायुतीत महत्त्वाचा असणार आहे अशी माहिती समोर येताना दिसत आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Maharashtra Politics : ‘भुजबळांच्या वयाचा आदर करतो पण…’; ‘या’ भाजप नेत्याने दिला इशारा
Pune Crime News : पुणे हादरलं ! नगर रस्त्यावर ट्रकच्या धडकेत 2 विद्यार्थ्यांचा दुर्दैवी मृत्यू