https://www.topnewsmarathi.com/wp-content/uploads/2022/04/fk9m2hro_sanjay-raut-pti_625x300_15_February_22.jpg

SANJAY RAUT; काश्मिरात हिंदूंचे हत्याकांड हा गृहयुद्धाचा भाग – संजय राऊतांचा भाजपवर हल्लाबोल

173 0

मुंबई : काश्मिरातील हिंदूंचे हत्याकांड हा गृहयुद्धाचा भाग आहे. गृहयुद्ध जास्तच भडकले तर ‘राजा’ आणि राष्ट्रप्रमुखाला पळून जावे लागते, अशी जहाल टीका शिवसेना, उबाठा गटाचे नेते खासदार संजय राऊत (SANJAY RAUT)यांनी केली आहे.

ते म्हणाले की, भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी गृहयुद्ध सुरू झाल्याचे म्हटले आहे. मात्र, गृहयुद्धाचे खापर त्यांनी सरन्यायाधीश संजीव खन्ना यांच्यावर फोडले. मणिपूरसारख्या राज्यात गेल्या तीन वर्षांपासून जो आतंक, अराजक, वर्गकलह रस्त्यांवर सुरू आहे, तो गृहयुद्धाचाच भाग आहे. त्यामागे मुसलमान आणि सुप्रीम कोर्ट नाही, तर भाजपचे राजकारण असल्याचा आरोप त्यांनी केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ईश्वराचे अवतार आहेत. तर दुब्यांसारखे लोक त्या अवताराची पिल्ले आहेत. मात्र, तरीही काश्मीरपासून मणिपूरपर्यंत गृहयुद्धाच्या ठिणग्या का उडत आहेत, असा सवाल त्यांनी केला.
पुलवामासारखेच काश्मीरच्या हत्याकांडाचे राजकारण केले जाईल. हिंदूंच्या जेवढ्या हत्या होतील, तेवढी मुसलमानांविरुद्ध आग ओकून अंधभक्तांना गृहयुद्धात ढकलले जाईल, असेही त्यांनी म्हटले.

मोदी आणि त्यांचे लोक द्वेषाचे विष पेरत आहेत. त्यातूनच पहलगाम हत्याकांड घडल्याचा आरोप त्यांनी केला. दहशतवाद्यांनी केवळ पुरुष पर्यटकांवर गोळ्या झाडल्या. महिलांना सोडून देताना, जाऊन सांगा तुमच्या मोदींना, असे दहशतवादी बोलला, याचा सरळ अर्थ धार्मिक गृहयुद्धाची ही ठिणगी पडली आहे. गेल्या दहा वर्षांत राज्य करणाऱ्या मोदी सरकारचे हे अपयश आहे. देशात द्वेष पसरविणारा भाजपचा खरा विकृत चेहरा अनुभवायचा असेल तर तो दिल्लीत निशिकांत दुबे आणि महाराष्ट्रात नितेश राणे हा असल्याची टीका राऊत यांनी केली.

नीतेश राणे यांनी उन्हाळ्यात थंडगार राहण्यासाठी गोमूत्र पितो, असे सांगितले. नितेश राणेप्रमाणेच मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस हे सुद्धा तेच पेय प्राशन करीत असतील. त्यामुळेच सरन्यायाधीशांवर अराजक माजवण्याचे आरोप केले गेले, असा जोरदार हल्ला राऊत यांनी चढविला.

Sanjay Raut: उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही अटी-शर्ती ठेवल्या नाहीतः संजय राऊत

POLITICAL SPECIAL EXCLUSIVE REPORT: 1962 ते 2019 पर्यंत महाराष्ट्राच्या विधानसभेत पोहोचले तब्बल ‘इतके’ अपक्ष आमदार

TOP POLITICAL किस्से: जेव्हा.. शरद पवार यांना पराभूत व्हावं लागलं होतं

Maharashtra Political Crisis : राज्याच्या राजकारणावर सचिन गोस्वामींची ‘ती’ पोस्ट व्हायरल…

WAQF BILL PASS IN LOKSABHA 13 तासांच्या चर्चेनंतर अखेर वक्फ सुधारणा विधेयक लोकसभेत मंजूर

Share This News
error: Content is protected !!