पुणे : काही दिवसांपूर्वी वायरल झालेल्या मंचर प्रकरणातील घटनेटवरून राजकारण पेटायला सुरुवात झाली आहे. राजकीय नेत्यांकडून आरोप -प्रत्यारोप सुरु आहेत. या घटनेवरून भाजपा (BJP) महिला प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी सुप्रिया सुळेंना (Supriya Sule) टोला लगावला आहे.
काय म्हणाल्या चित्रा वाघ?
तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत.. मुलीला मुस्लिम तरूणानं पळवून नेलं. ती अडीच वर्ष सापडली नाही. तेंव्हा तुमचंच लाडकं सरकार होतं..
तसेच श्रद्धा वालकर प्रकरणात (Shraddha Walker Case) तुम्ही वेळीच लक्ष दिलं असतं तर तिचेही 35 तुकडे झाले नसते. वसुलीत मग्न असलेल्या तुमच्या गृहमंत्र्यांना श्रद्धा वालकरच्या आई वडिलांची हाक ऐकू आली नाही, हे ही दुर्दैवच !
सुप्रिया ताई, तुमची रंग बदलण्याची कला पाहून सरड्याला पण लाज वाटली असेल… किती सोयीस्करपणे तुमच्या संवेदना जाग्या होताहेत हो @supriya_sule
तुमच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या मंचरच्या मुलीसाठी तुमच्या संवेदना जाग्या झाल्या नाहीत.. मुलीला मुस्लिम तरूणानं पळवून नेलं. ती अडीच वर्ष…
— Chitra Kishor Wagh (Modi ka Parivar) (@ChitraKWagh) June 8, 2023
मीरा रोड प्रकरणात नक्कीच कारवाई होईल. दोषींची गय केली जाणार नाही कारण इथे गृहमंत्रालय देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांच्यासारख्या सक्षम नेत्याकडे आहे. त्यासाठी तुम्हाला ‘मगरमच्छ के आंसू’ गाळण्याची गरज नाही,मोठठ्या ताई… असे चित्रा वाघ म्हणाल्या आहेत.