नागपूर : महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर येथे सध्या महाराष्ट्र विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे. दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी सोमवारी भारतीय जनता पार्टीवर जोरदार हल्लाबोल केला. अजित पवार यांना मुख्यमंत्री करा. मी पाठिंबा देतो आणि सभागृहात ठराव मांडतो. मला तुमचा दम बघायचा आहे. माझ्या पक्षाची हमी मी घेतो, असं आव्हान भास्कर जाधव यांनी भाजपाला दिलं. ज्याच्याबरोबर मैत्री कराल, त्याचं वाटोळं केल्याशिवाय राहत नाही, अशी टीका भास्कर जाधव यांनी केली. यावर ठाकरे गटाचे नेते आमदार वैभव नाईक यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले वैभव नाईक?
“भारतीय जनता पार्टी प्रत्येकाचा वापर करून घेते. भाजपाने गेली 25 वर्षे शिवसेनेचा वापर केला. उद्धव ठाकरे यांनी पुढे शिवसेनेचा वापर करू दिला नाही, म्हणून आमची युती तुटली. तसेच भाजपा अनेकवेळा राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर युती करण्यास इच्छुक होती. अनेकदा बोलणीही झाली.” “भाजपाने अजित पवार यांचा वापर राष्ट्रवादी काँग्रेस फोडण्यासाठी केला आहे. त्यामुळे अजित पवारांना भाजपा कधीही मुख्यमंत्री करणार नाही. कारण लोकांमध्ये असलेला नेता भाजपाला आवडत नाही आणि परवडत नाही, हे अनेकदा आपण बघितलं आहे. त्यांना फक्त त्यांच्या ताटाखालचे मांजर पाहिजे असतात. त्यामुळे ते अजित पवारांना कदापि मुख्यमंत्री करणार नाहीत. त्यामुळे भास्कर जाधव यांनी उपरोधिकपणे विधान केलं आहे,”असे वैभव नाईक म्हणाले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Ajit Pawar : राज्य सरकारमध्ये अर्थखातं कसं मिळालं? अजित पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट
Pune Accident : एमआयटी शाळेच्या विद्यार्थ्यांच्या रिक्षाचा भीषण अपघात; 5 विद्यार्थी जखमी
Devendra Fadnavis : ड्रग्ज तस्करांशी हातमिळवणी करणारे पोलिस बडतर्फ होणार; फडणवीसांची मोठी घोषणा
Rupali Chakankar : रुपाली चाकणकरांविरोधात गुन्हा दाखल करा; संभाजी ब्रिगेडची मागणी
Amravati News : अमरावतीमध्ये भीषण अपघात; ट्रॅक्टर पलटी होऊन 20 मजूर जखमी
Weather Update : राज्यात थंडीला सुरुवात; मात्र ‘या’ ठिकाणी आज पडणार पाऊस
Maratha Reservation : राजकीय हस्तक्षेपामुळे मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा