नुकत्याच झालेल्या हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकीमध्ये हरियाणा काँग्रेसला जोरदार झटका बसला आहे. हरियाणा सत्ता स्थापनेचा स्वप्न बघणाऱ्या काँग्रेसला अवघ्या 37 जागांवर समाधान मानावं लागलं.
इंडिया आघाडीमध्ये एकत्र असणाऱ्या काँग्रेस आणि आम आदमी पक्षांना हरियाणा मध्ये मात्र वेगळी निवडणूक लढवली होती. यावरूनच सामनाच्या अग्रलेखातून काँग्रेसचे कान टोचले असून हरियाणातील या पराभवातून महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी शिकावं असं बरंच काही आहे आम आदमी पक्षासारख्या मित्र पक्षांना दूर ठेवल्याचा हरियाणात काँग्रेसला मोठा फटका बसला असं म्हटलं होतं.
अशातच आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी काँग्रेसला खोचक टोला लगावलाय.
भाजपप्रती लोकांमध्ये नाराजी होती, पण लोकांनी त्यांनाच मतदान केले. काँग्रेस पक्षाला आता आपली रणनीती तपासून पाहावी लागेल. भाजपशी थेट लढत झाली की काँग्रेस कमकुवत होते. काँग्रेसने याचा विचार करून आपली रणनीती सुधारावी,” असं चतुर्वेदी यांनी म्हटलं आहे