कराड : राष्ट्रवादी काँगेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) साहेबांशी सर्वसामान्य जनता जोडली गेली असल्यामुळे, जोपर्यंत सर्वसामान्य जनता पक्षासोबत आहे, तो पर्यंत पक्षाला (Sharad Pawar) काहीही फरक पडणार नाही, असं मत आर. आर. पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी व्यक्त केलं आहे. आज शरद पवार हे कराड येथील यशवंत राव चव्हाण यांच्या समाधी स्थळाच दर्शन घेणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर पवार आज यशवंतराव चव्हाण यांच्या समाधी स्थळी येणार आहेत.
Sharad Pawar : अजित पवारांच्या बंडानंतर शरद पवार अॅक्शन मोडमध्ये; खेळली पहिली चाल
राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पुन्हा एकदा सर्वसामान्यांच्या ताकतीवर पुन्हा उभा राहील. जे आमदार भाजपा सोबत गेलेत ते परत येतील की नाही हे आत्ता सांगणे कठीण आहे. असे रोहित पाटील म्हणाले.यशवंतराव चव्हाण हे महाराष्ट्रातील अनेक युवकांचे आदर्श आहेत.शरद पवारांनी नाळ सर्व सामान्य लोकांशी जोडली गेली असल्यामुळे जोपर्यंत सामान्य जनता आहे तो पर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला काहीही फरक पडणार नाही.
Maharashta Politics : ‘या’ 6 काका-पुतण्यांच्या जोड्या ज्यांनी दिलं महाराष्टाच्या राजकारणाला नवे वळण
आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी आम्ही यशवंतराव चव्हाण यांचे आशीर्वाद घेऊन, जोमाने वाटचाल करणार आहोत. राष्ट्रवादी काँगेस पक्षाने सर्वसामान्य जनतेसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले आहेत. शरद पवारांनी (Sharad Pawar) महिलांना आरक्षण देण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे. पुन्हा एकदा पवार साहेबांच्या नेतृत्वात पक्ष पुन्हा एकदा भरारी घेईल, रोहित पाटील म्हणाले.