छत्रपती संभाजीनगर : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र चाळीस दिवसांत आरक्षण न मिळाल्यानं जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण सुरू केले होतं. यानंतर राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली, शिष्टमंडळासोबत चर्चा केल्यानंतर जरांगे पाटील यांनी नवव्या दिवशी आपलं उपोषण मागे घेतलं. मात्र उपोषण मागे घेतानाच त्यांनी सरकारला आरक्षणासाठी नवी डेडलाईन दिली. यादरम्यान त्यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला.
शुक्रवारी अजित पवार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवर जरांगे पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली.दादांनी शाह यांची भेट का घेतली माहित नाही. ही भेट वैयक्तिक होती की आरक्षणाबाबत याची देखील माहिती नाही. मात्र या भेटीत जर आरक्षणावर चर्चा झाली असेल तर चांगली गोष्ट आहे. त्यांनी आरक्षणावर बोललं पाहिजे. आरक्षण हा मराठा समाजाच्या अस्तेचा विषय आहे, असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.