Shinde Fadanvis Decision

मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांसाठी घेण्यात आला ‘हा’ मोठा निर्णय

357 0

मुंबई : आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे. या नव्या निर्णयानुसार मागील वर्षी पावसाळ्यात नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आता सुधारित दराने मदत देण्यात येणार आहे. मागील पावसाळ्यात नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव अजूनही प्रलंबित होते. या शेतकऱ्यांना आता नवीन सुधारित दराने मदत मिळणार आहे, त्यासाठी पंधराशे कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाच्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळण्यास मदत होणार आहे. मागील पावसाळ्यात नुकसान झालेल्या अनेक शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्रलंबित होते, या शेतकऱ्यांना आता नवीन सुधारित दराने मदत मिळणार आहे. आजच्या बैठकीत हे नवीन दर निश्चित करण्यात आले. या दरानुसार जिरायत जमिनीसाठी 8 हजार पाचशे तर बागायत जमिनीसाठी 17 हजार रुपयांप्रमाणे मदत देण्यात येणार आहे. यासाठी सरकारने दीड हजार कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केली आहे.

मागच्या वर्षी शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. खरीप हंगामात झालेल्या या अतिवृष्टीमुळे बाजरी, कापूस यासारख्या पिकांना मोठा फटका बसला होता. तर रब्बी हंगामात झालेल्या अवकाळी पावसामुळे ज्वारी, गहू, हरभरा या पिकांना मोठा फटका बसला होता. या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिसकावून घेतला होता.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!