चंद्रपुर : राजुरा तालुक्यातील देवाडा व अन्य तीन गावात गॅस्ट्रेाचा उद्रेक झाला आहे.तिघांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला.दुषित पाण्यामुळं हा हा उद्रेक झाल्याच सांगितलं जात आहे.दरम्यान माजी केंद्रिय गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी देवाडा गावाला भेट दिली. अधिका-यांचा निष्काळजीपणावर त्यांनी ताशेरे ओढले.
दुषित पाण्यामुळे देवाडा येथे रुग्णांची प्रकृती ढासळत असल्याचे ठावूक असतांना ग्रामसेवकाने आपल्या कर्तव्यात कसूर केल्याने गावात रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे.लोकांना वेळीच शुध्द पाणी पुरविल्या गेले असते तर या गावात तीन रुग्णांवर मृत्यु ची पाळी उद्भवली नसती. रुग्णालयात तीन रुग्ण दगावले व एक रुग्ण घरी दगावल्याने प्राथमिक आरोग्य केंद्रात या रुग्णाची नोंद नसली तरी अजूनही गावातली परिस्थिती भयावह असल्याचे हंसराज अहीर यांनी म्हटले आहे.
प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये 97 रुग्ण दाखल करण्यात आले. देवाडा सह, सोंडो, टेंभुरवाही व अन्य गावातील रुग्णांचा समावेश त्यात आहे.देवाडा प्राथमिक आरोग्य केंद्रामधील दुरवस्थेबद्दल अहीरांनी नाराजी व्यक्त केली.देवाडा आरोग्य केंद्र एकाच वैद्यकीय अधिकाऱ्याच्या भरवशावर चालत आहे.