Road Accident

Road Accident : लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या गाडीचा भीषण अपघात; 3 जणांचा मृत्यू

640 0

बुलंदशहर : उत्तर प्रदेशातील जनपद बुलंदशहरमधून एक भीषण अपघाताची (Road Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये लग्नाला जात असताना वऱ्हाडाची गाडी कालव्यात कोसळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातामुळे लग्नस्थळी शोककळा पसरली आहे. वऱ्हाड्यांनी भरलेली ईको कार कालव्यात कोसळली. या भीषण अपघाताची माहिती मिळताच डीएम, एसएसपी यांच्यासह जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली.

काय घडले नेमके?
हाती आलेल्या माहितीनुसार, ही धक्कादायक घटना उत्तर प्रदेशातील जनपद बुलंदशहरमधून जहांगीरपूर इथून जात असताना हा भीषण अपघात झाला. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला तर अजून तीन जण बेपत्ता असून एनडीआरएफकडून त्यांचा शोध सुरू आहे.बुलंदशहरच्या शेरपूर गावातून आठ जण इको कारमधून अलीगढ पिसावा लग्न समारंभात सहभागी होण्यासाठी जात होते. यावेळी जहांगीरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कपना कालव्यात इको कार पडली आणि हा अपघात झाला.

या अपघातात आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला, तर दोन जण जखमी आहे. त्यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी या अपघाताची दखल घेत सर्व मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे.

नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.

Dhanurasana : धनुरासन कसे करावे? काय आहेत त्याचे फायदे?

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!