जैसलमेर : दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये फिरायला निघालेल्या (Rajasthan News) कुटुंबावर काळाने घाला घातला आणि एका क्षणात होत्याचं नव्हतं झालं. यामध्ये कुटुंबातील सहा जणांचा मृत्यू झाला. राजस्थान राज्यात झालेल्या भीषण अपघातात जळगावातील अमळनेर तालुक्यातील सहा जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी आहे.
दिवाळीच्या सुट्ट्या असल्याने दोन शिक्षकांची कुटुंब राजस्थानमध्ये फिरायला गेले होते. यादरम्यान राजस्थान मधील बारमेर रस्त्यावर डोरीमना गावाजवळ दोन्ही शिक्षकांचे कुटुंब असलेल्या कारला कंटेनरने जोरदार धडक दिली. ही धडक एवढी भीषण होती कि यामध्ये कारमधील 6 जण ठार झाले आहेत. 1 जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर राजस्थानमध्ये उपचार सुरु आहे.
या अपघातात मृत पावलेल्यांमध्ये तीन चिमुकल्यांचा समावेश आहे. जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील मांडळ येथील शिक्षक धनराज सोनवणे त्यांची पत्नी सुरेखा बाबूलाल मैराळे उर्फ सुरेखा धनराज सोनवणे (वय 50), मुलगी स्वरांजली धनराज सोनवणे (वय 5 वर्षे) तसेच गायत्री योगेश साळुंखे (वय 30), प्रशांत योगेश साळुंखे (वय 7 वर्ष), भाग्यलक्ष्मी साळुंखे (वय 1 वर्ष) या सहा जणांचा जागीच मृत्यू झाला.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.