नागपूर : नागपूरमधून एक भीषण अपघाताची (Nagpur Accident) घटना समोर आली आहे. यामध्ये अपघातग्रस्त स्कॉर्पिओ कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकवर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. रविवारी रात्री हा अपघात झाला आहे. चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला.
नागपूरच्या बुट्टीबोरी परिसरामध्ये हा भीषण अपघात झाला आहे. वर्धा जिल्ह्यातल्या रामनगर येथील श्रीवास्तव कुटुंब हे नागपूरला येत असताना बुट्टीबोरीचा ओव्हर ब्रिज ओलांडल्यानंतर हा भीषण अपघात झाला आहे.अपघातग्रस्त स्कॉर्पिओमधून श्रीवास्तव कुटुंबातील सहा जण व चालक असे एकूण सात जण प्रवास करत होते. त्यापैकी एका दाम्पत्याचा मृत्यू झाला तर बाकी 5 जण गंभीर जखमी झाले आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.