जळगाव : राज्यात सध्या आत्महत्यांचे (Jalgaon News) प्रमाण वाढले आहे. एका कोणत्या तरी शुल्लक कारणावरून तरुण पिढी टोकाचे पाऊल उचलताना दिसत आहेत. सध्या अशीच एक धक्कादायक घटना जळगावमध्ये घडली आहे. यामध्ये एका शाळकरी विद्यार्थ्यांने एका शुल्लक कारणावरून आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. तन्मय गजेंद्र पाटील आत्महत्या करणाऱ्या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
तन्मय गजेंद्र पाटील याने राहत्या घरात वरच्या मजल्यावर जाऊन गळफास घेऊन आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. तो जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात राहत होता तर एटी झांबरे विद्यालयामध्ये तो 10 वीच्या वर्गात शिकत होता. तन्मयने आपल्या आयुष्याचा शेवट करण्याच्या अगोदर एक सुसाईड नोट लिहिली होती. यामध्ये त्याने आपल्याला अभ्यासाचा ताण सहन होत नसल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे म्हंटले आहे.
या घटनेमुळे तन्मयच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. तन्मय आत्महत्या प्रकरणी जळगाव शहरातील जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून जळगाव पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.