बीड : बीडमध्ये पती – पत्नींच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. बीड जिल्ह्याच्या (Beed) धार तालुक्यातील कासारी गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. पतीने दुसरं लग्न करत असल्याचे सांगितल्याने पत्नीने विष पिऊन आत्महत्या (Suicide) केली आहे. पतीने तू मला आवडत नाही, तू घरातून निघून जा, आता मी दुसरे लग्न करणार असल्याची धमकी (Threat) दिल्याने पत्नीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ही घटना 18 मे रोजी धार तालुक्यातील कासारी गावामध्ये घडली. या प्रकरणी विवाहितेच्या वडिलांच्या फिर्यादीवरून पती, जावई व नंदावा यांच्याविरोधात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे. ऋतुजा कृष्णा फड (वय 26 वर्षे, रा. हिंगणगाव, ता. अहमदपुरी) (Rituja Krishna Phad) असे मृत विवाहित महिलेचे नाव आहे. 24 डिसेंबर 2021 रोजी विवाहितेचा विवाह हिंगणगाव (ता. अहमदपूर) झाला होता. सुरुवातीचे काही दिवस तिला सुखाने नांदविले, परंतु, नंतर तिचा छळ करण्यास सुरुवात झाली.
मे रोजी कृष्णाने ऋतुजाला माहेरी कासारी येथे आणून सोडले. यावेळी विवाहितेने आपल्या वडिलांसमोर आपल्याला होत असलेला त्रास सांगितला. तुला मुले होत नाहीत, तू दिसायला छान नाहीस, तू आता घरातून निघून जा, आम्हाला दुसरे लग्न करायचे आहे, असे म्हणत तिला शिवीगाळ करून मारहाण करण्यात येत असल्याचे तिने आपल्या वडिलांना सांगितले होते. यामुळे ऋतुजा मानसिक तणावात होती. 18 मे रोजी ऋतुजाचे आई-वडील शेतात काम करण्यासाठी गेले होते परत आल्यावर त्यांना ऋतुजा घरातील व्हरांड्यात बेशुद्ध पडलेली दिसली. त्यांनी रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.