देशभरात गाजलेल्या सैराट चित्रपटाने ऑनर किलिंगचं (HONOR KILLING) भीषण वास्तव मांडलं होतं. त्याच पद्धतीने आता जळगाव देखील प्रेमविवाह केलेल्या जोडप्यावर मुलीच्या बापाने चक्क गोळ्या झाडल्यात. यात या मुलीचा मृत्यू झालाय तर तिचा नवरा गंभीर जखमी आहे. हे हत्याकांड नेमकं कसं झालं पाहूया…ही घटना जळगाव मधील चोपडा शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर परिसरात काल घडली. तृप्ती किरण मंगले या 24 वर्षीय मुलीने अविनाश वाघ 28 वर्षीय तरुणाची दोन वर्षांपूर्वी प्रेम विवाह केला. हा विवाह तिच्या कुटुंबीयांना मान्य नव्हता. मात्र अविनाश वर जीवापाड प्रेम करणाऱ्या तृप्तीने आपलं प्रेम तडीस न्यायचं ठरवलं. आणि या दोघांनीही प्रेमविवाह केला.
त्यानंतर हे दोघेही पुण्यातील कोथरूड परिसरामध्ये वास्तव्यास आले. दरम्यान अविनाशच्या बहिणीचे लग्न असल्याने हे दोघे जळगावला आले होते. यावेळी बहिणीच्या हळदीसाठी आपली लेक आणि जावई त्याठिकाणी आल्याची माहिती सासऱ्याला मिळाली. त्यामुळे मला विरुद्ध केलेल्या प्रेमविवाहाचा बदला घेण्यासाठी निवृत्त सीआरपीएफ अधिकारी असलेल्या सासऱ्याने बंद ठेवून विवाहास्थळ गाठलं. त्या ठिकाणी नवरी मुलीची हळद सुरू होती आणि भर मांडवात आरोपी किरण मंगले यांनी आपल्याच मुलीवर आणि जावयावर बेछूट गोळीबार केला. या घटनेत मुलगी तृप्तीचा मृत्यू झाला.
तर जावई अविनाश याला पाठीत व हाताला गोळी लागल्याने तो गंभीर जखमी झाला आहे. जळगाव मधील रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू असून हे गोळीबार झाल्यानंतर नातेवाईकांनी आरोपी किरण मंगले याला देखील बेदम मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.या घटनेची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक महेश्वर रेही यांनी घटनास्थळी जाऊन संपूर्ण माहिती घेतली. या प्रकरणात आता गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून टाकलंय. आजही महाराष्ट्रात ऑनर किलिंगच्या शेकडो घटना घडत असून या घटना रोखण्यासाठी अनेक कायदे केले असले तरीही या घटना रोखण्यात यश येत नाहीये.
#INFORMATIVE : आधार कार्ड हरवले तर… ? अशी असते प्रक्रिया, माहिती असू द्या !