बुलढाणा : राज्यात अपघाताचे (Buldhana Accident) प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. खानदेश विदर्भ सीमेवर तालसवाडा महामार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे तर अनेक जण जखमी झाले आहेत. या अपघातामुळे विदर्भ खानदेश महामार्गावर गेल्या दोन तासापासून वाहतुकीच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. या अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन बचावकार्याला सुरुवात केली आहे.
टोलनाक्याच्या निष्काळजीपणामुळे एकतर्फी वाहतूक सुरू असल्याने अपघात घडल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आठवड्याभरापासून रस्ता बंद करण्यात आलेला आहे. 6 महिने झालं पूल झालेला, मधेच रस्त्याला भगदाड पडले. त्यामुळे रस्ता बंद पडला, एक बाजू सुरू केली. त्यामुळे अपघात होत आहेत असा आरोप वाहनचालकांनी केला आहे. चौपदरी रस्ता असून एकच बाजू सुरू आहे.
पुलाला भगदाड पाडल्यानंतर कोणतेही बोर्ड लावलेले नाहीत.मातीचा ढिग टाकल्याने गाड्या उलटल्याचं वाहनधारकांनी म्हटलं. गेल्या 8-10 दिवसांपासून टोल चालु आहे पण एक साइड सुरू आहे. समोर समोर गाड्या येऊन अपघात होत आहेत. या सर्व अपघाताला प्रशासन जबाबदार आहे. या प्रकरणी दोषींवर कारवाई व्हावी अशी मागणी स्थानिकांमधून होत आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Kedar Shinde : बाईपण भारी देवा नंतर येतोय ‘आईपण भारी देवा’; केदार शिंदेकडून नव्या सिनेमाची घोषणा
Dolly Sohi : ‘हिटलर दीदी’ फेम अभिनेत्री डॉली सोही हिचं निधन
Mahashivratri : महाशिवरात्रीच्या निमिताने जाणून घेऊया भारतातील शंकराच्या 12 ज्योतिर्लिंगांबद्दल
Women’s Day Special : आज महिला दिनाच्या निमित्त महिलांच्या अधिकारांबद्दल जाणून घेऊया
Virabhadrasana : वीरभद्रासन म्हणजे काय? त्याचे काय आहेत फायदे?