Aurangabad Crime

Aurangabad Crime : औरंगाबाद हादरलं ! गावठी कट्ट्यातून सुटलेल्या गोळीने स्वतःच्याच लेकराचा घेतला जीव

2562 0

औरंगाबाद : औरंगाबाद (Aurangabad Crime) जिल्ह्यातील गंगापूर शहरात मन सुन्न करुन टाकणारी घटना समोर आली आहे. यामध्ये (Aurangabad Crime) खासगी बँकेत कर्ज वसुलीचे काम करणाऱ्या एकाने अवैधरित्या गावठी कट्टा विकत घेतला होता. मात्र त्याला कट्टा चालवायचा माहित नसल्याने अचानक त्यातून गोळी सुटली आणि त्याच्याच अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या कपाळात घुसली. यानंतर तातडीने या चिमुकल्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, आज या चिमुकल्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आर्यन राहुल राठोड (वय 2 वर्षे), असे मृत चिमुकल्याचे नाव आहे तर राहुल कल्याण राठोड (वय 29 वर्ष) असे आरोपी वडिलांचे नाव आहे.

काय घडले नेमके?
औरंगाबादच्या गंगापूर शहरातील अहिल्यादेवीनगर येथे राहुल कल्याण राठोड आपली पत्नी संगीता आणि अडीच वर्षांच्या मुलासह राहतो. राहुल हा कर्ज वितरण करणाऱ्या एका बँकेत वसुलीचे काम करतो. दरम्यान, आपल्या कामात वसुलीचे करण्याची गरज पडते म्हणून त्याने एक गावठी कट्टा विकत घेतला. 25 ऑगस्ट रोजी तो गावठी कट्टा आपल्या घरी घेऊन आला. पण हा गावठी कट्टा नेमका चालवायचा कसा याबाबत राहुलला कोणतीही माहिती नव्हती.

दरम्यान, घरी आल्यावर सायंकाळी सहाच्या सुमारास आपण आणलेला गावठी कट्टा तो आपल्या पत्नीला दाखवत होता. पण याचवेळी कट्ट्यातून गोळी सुटली आणि त्यांच्याच अडीच वर्षांच्या चिमुकल्या मुलाच्या कपाळात घुसली. घरात झालेल्या गोळीबारात मुलगा आर्यन राठोड गंभीर जखमी झाला. यानंतर त्याला तातडीने रुंग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरु होते.अखेर 48 तासांनी म्हणजे आज या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे आर्यनच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून सगळीकडे हळहळ व्यक्त केली जात आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!