मुंबई : राज्यात अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. आज पहाटेच्या सुमारास नगर कल्याण महामार्गावर (Accident In Nagar-Kalyan Highway) हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टरट्रक्टर व ठाणे – मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांचा ढवळपुरी फाटयाजवळ पहाटे 2.30 च्या दरम्यान भीषण अपघात झाला आहे. 5 जणांचा जागीच मृत्यू झाला तर एकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
काय घडले नेमके?
कल्याण-निर्मल महामार्गावर उस वाहतूक करणारा ट्रॅक्टर व ठाणे मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांच्यात ढवळपुरी फाट्याजवळ पहाटेच्या सुमारास जोरदार धडक बसली. हा अपघात इतका भीषण होता की तिन्ही वाहनांचा पूर्णपणे चक्काचुर झाला आहे. या वाहनांचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. यात 6 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.अपघातातील जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळं काही वेळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.
या अपघाताची माहिती मिळताच डिवायएसपी संपतराव भोसले, पोलीस निरीक्षक समीर बारवकर, पारनेरचे सहायक पोलीस निरिक्षक प्रमोद वाघ हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. दरम्यान अपघातग्रस्तांची ओळख पटविण्याचे काम सुरु आहे. पारनेर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune News : FTII मधील बॅनरचा वाद पोलिसांत; 7 जणांविरोधात गुन्हा दाखल
Ram Mandir : फक्त 10 दिवस अन् तब्बल 70 टक्क्यांनी स्वस्त मिळेल अयोध्येचं तिकीट
Vasai Local News : सिग्नल दुरुस्तीचे काम करताना लोकलची धडक बसल्याने 3 कर्मचाऱ्यांचा जागीच मृत्यू
Gadchiroli News : महिला कामगारांना घेऊन जाणारी बोट वैनगंगा नदीपात्रात उलटली; 5 जण बेपत्ता