घरची परिस्थिती बेताची, आरक्षणही नाही.. नैराश्यात 18 वर्षीय तरुणीची आत्महत्या
मराठा आरक्षणाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही. याच प्रश्नासाठी मनोज जरांगे पाटील अनेक दिवस जालन्यामध्ये उपोषणाला बसले होते. याच जालन्यात एक अठरा वर्षीय तरुणीने घरची परिस्थिती बेताची असल्यामुळे नैराश्यात आत्महत्या केल्याची गंभीर घटना घडली आहे.
भोकरदन तालुक्यातील देऊळगाव ताड येथे राहणाऱ्या शिवानी संजय हिवाळे या वर्षीय तरुणीने आत्महत्या केली. नुकताच शिवानी चा बारावीचा निकाल लागला होता. तिला बारावीला 72 टक्के पडले होते. मात्र घरची परिस्थिती हालाखीची असल्यामुळे पुढील शिक्षणासाठी पैसे नाहीत. त्यात आरक्षणही नाही, आरक्षण असते तर कमी खर्चात शिक्षण झालं असतं, अशा आशयाची चिठ्ठी लिहीत शिवानीने आत्महत्या केली. बुधवारी सायंकाळच्या सुमारास विहिरीत उडी घेत तिने आपले जीवन संपवले.
बी ए करायचे स्वप्न अपूर्ण
शिवानीचे आत्तापर्यंतचे शिक्षण तिच्या मामाने पूर्ण केले होते. मामाच्या पाठिंब्यामुळे तिने बारावीत 72 टक्के मार्क मिळवले. यापुढे तिला शिकण्याची इच्छा होती. बी.ए.च्या प्रथम वर्षाला प्रवेशही घ्यायचा होता. मात्र घरची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे तिला नैराश्य आले आणि याच नैराश्याच्या करतेत तिने आपले जीवन संपवले. या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.