महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षाबाबत महत्त्वाची सुनावणी 1 ऑगस्ट ऐवजी आता 3 ऑगस्टला होणार आहे. सरन्यायाधीश रमण्णा यांच्या पीठासमोर ही सुनावणी देण्यात आली आहे.त्यामुळं राज्याच्या सत्ता संघर्षाच्या लढाईचं प्रकरण विस्तारित खंडपीठाकडे किंवा घटनात्मक पीठाकडे जाणार का याचा फैसला आता 3 ऑगस्टला होणार आहे.निवडणूक आयोगाच्या नोटिशीला स्थगिती मिळणार का ? हे देखील याच दिवशी कळणार आहे.
