नुकताच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीची पीछहाट झाल्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सरकार मधूनच बाहेर पडण्याची तयारी दर्शवली आहे.
राज्यातील लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचे वर्चस्व दिसले. यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पराभवाची जबाबदारी स्विकारली असून त्यांनी सरकारमधून मला वेगळं करावं, अशी नेतृत्वाला विनंती केली आहे.
पक्ष नेतृत्वाने मला उपमुख्यमंत्री पदावरून मुक्त करत पक्ष संघटनेत पूर्णवेळ काम करण्याची संधी द्यावी अशी इच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे.