Bhai Jagtap

काँग्रेसनं भाकरी फिरवली! मुंबई अध्यक्ष पदावरून भाई जगतापांची उचलबांगडी

950 0

मुंबई : ऐन निवडणुकांच्या तोंडावर काँग्रेसकडून (Congress) मोठे बदल करण्यात आले आहेत. मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून भाई जगताप (Bhai Jagtap) यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. भाई जगताप यांच्याजागी काँग्रेसचे दिवंगत नेते एकनाथ गायकवाड ( Eknath Gaikwad) यांच्या कन्या वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांची मुंबई अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल (Congress General Secretary KC Venugopal) यांनी याबाबतची घोषणा केली आहे. भाई जगताप यांची मुंबई अध्यक्षपदावरून उचलबांगडी का करण्यात आली? याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

वर्षा गायकवाड ह्या मुंबईतील धारावी मतदारसंघातून सलग चार वेळा विधानसभेवर निवडून गेल्या आहेत. तसेच त्यांनी 2019 मध्ये महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आल्यानंतर शालेय शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिले होते. त्याआधी आघाडी सरकारच्या काळात महिला आणि बालविकास मंत्री म्हणून काम पाहिले होते.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!