SANJAY RAUT ON BJP:मुंबई : असा दावा शिवसेना, उएकनाथ शिंदे, अजित पवार जोपर्यंत भाजपसोबत आहेत, तोपर्यंत मुख्यमंत्री होणार नाहीत, असा दावा शिवसेना, उद्धव ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (SANJAY RAUT ON BJP) यांनी केला आहे.
‘अमित शहा महाराष्ट्राचे शत्रू खासदार’ Sanjay Raut यांची पत्रकार परिषद पुण्यातून UNCUT
शिंदे आणि अजित पवार यांचे पक्ष भाजपमध्ये विलीन झाले तरच हे दोघे कदाचित भाजपचे मुख्यमंत्री होऊ शकतील, असेही राऊत यांनी म्हटले आहे (SANJAY RAUT ON BJP)
प्रसारमाध्यमांशी बोलताना राऊत म्हणाले की, छगन भुजबळ जर शिवसेनेत आणखी काळ राहिले असते तर ते मुख्यमंत्री झाले असते, असे मी नेहमी म्हणतो.
नारायण राणे सुद्धा अजून काही काळ शिवसेनेत राहिले असते तर ते निश्चितच पुन्हा मुख्यमंत्री झाले असते. मनोहर जोशी शिवसेनेत निष्ठेने राहिल्यामुळेच मुख्यमंत्री झाले.
मात्र, एकनाथ शिंदे आता पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत.
अजित पवार हे देखील जोपर्यंत भाजपसोबत आहेत, तोपर्यंत मुख्यमंत्री होणार नाहीत.
त्यांचे दोन्ही पक्ष भाजपमध्ये विलीन झाले तरच ते कदाचित सिद्धरामय्या यांच्याप्रमाणे भाजपचे मुख्यमंत्री होऊ शकतील. याबाबत मी दैनिक सामनामध्ये लिहिले आहे. अमित शहा यांनीही त्यांना हे स्पष्टपणे सांगितल्याचा दावा राऊत यांनी याबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात केला.
अमित शहा महाराष्ट्रातील तीन पक्ष चालवतात. त्यातील एक भाजप, दुसरा शिंदे यांचा पक्ष तर तिसरा अजित पवार यांचा पक्ष आहे. अमित शहा यांनी महाराष्ट्राशी संबंधित पक्ष तोडले. त्यामुळे शत्रू असलेल्या शहा यांच्या पक्षाकडून कोणी सत्कार स्वीकारत असतील तर ती महाराष्ट्राशी बेइमानी ठरेल, अशी टीका त्यांनी केली.
Ganpati News : महाराष्ट्रातील ‘या’ गावात होत नाही गणपतीची प्राणप्रतिष्ठापना
Pune Ganpati : पुण्यात दर्शनासाठी गणेशभक्तांची रेकॉर्ड ब्रेक गर्दी
BJP STATE GOVERNMENT: महाराष्ट्रासह या राज्यात आहेत भाजपाचे मुख्यमंत्री