AMBADAS DANVE ON MAHAYUTI GOVERMENT मुंबई : भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून जनतेचे लक्ष हटवण्यासाठी महायुती सरकारने १०० दिवस मूल्यांकन कार्यक्रम घेतला असून तो फसवा आणि धुळफेक करणारा आहे, असा आरोप विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे.
AMBADAS DANVE ON MAHAYUTI GOVERMENT
https://www.youtube.com/live/vHtUGnrZecc?si=eXL1cKB2ShLHlK-c
ते म्हणाले की, सरकारने विविध विभागांच्या १०० दिवसांच्या कामकाजाचे मूल्यांकन सुरू केले आहे.
मात्र,भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून जनतेचे लक्ष हटविण्यासाठीच मूल्यांकनाचा हा घाट घातला आहे. सरकारने आपल्या कामकाजाचे मूल्यांकन स्वतःकडून नव्हे तर जनतेकडून केल्यावरच त्यांना त्यांची निश्चित क्षमता समजेल. सरकारने एप्रिल महिन्यात विभागांच्या गुणांकात वाढ कशी केली, असा सवाल त्यांनी केला.
शिवसेनेत गद्दारी झाली तेव्हा बाळासाहेब पाटील आमदारांना सुरतला घेऊन गेले होते.
राज्यात गुटखा बंदी असताना गुजरातमधून पालघरमध्ये अवैधरित्या गुटखा आणला जातो. या बाळासाहेब पाटीलविरोधात नियमबाह्य बदल्या केल्याच्याही तक्रारी आहेत.
मात्र, तरीही पोलीस अधीक्षक म्हणून त्यांना नंबर वन मूल्यांकन कसे दिले, असा सवाल त्यांनी केला.
लाडकी बहीण योजनेतून ८ लाख महिलांना वगळले. पिंक रिक्षा उपक्रम अपयशी ठरला. आशा वर्कर, अंगणवाडी सेविकांच्या मानधनाचा प्रश्न प्रलंबित आहे. महिलांच्या अनेक विषयांकडे दुर्लक्ष करणाऱ्या महिला व बालकल्याण विभागाला पहिला क्रमांक देण्यात आला.
एसटी कर्मचाऱ्यांना फक्त ४० टक्के पगार देणाऱ्यांना गुणांकन कसे मिळाले, असा सवालही दानवे यांनी विचारला.
राज्यात महिला अत्याचाराची २१०० प्रकरणे समोर आली. गृहमंत्र्यांच्या नागपूरमध्ये एप्रिल महिन्यात भररस्त्यात १४ खून झाले. कृषी विभागाने भ्रष्टाचारामुळे १ रुपयांत पीक विमा योजना बंद केली. मराठवाड्यात २८९ शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्या आहेत.
राज्याची आर्थिक स्थिती डबघाईला आली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली नाही. कर्ज थकल्यामुळे बँका कर्ज देत नाहीत, अशी परिस्थिती असल्याचे दानवे यांनी सांगितले.
रोड शो दरम्यान छातीत दुखू लागल्याने मुंबईला परतला गोविंदा; दुसऱ्याच दिवशी प्रचारासाठी पुन्हा हजर
Maharashtra Politics : राज्याला दोन मुख्यमंत्री देणाऱ्या नांदेडला यंदा मंत्रीपदाचा भोपळा