राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांना पुन्हा अपघात, १२ गाड्यांचे नुकसान

491 0

औरंगाबाद – मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्याच्या सभेसाठी औरंगाबाद येथे दाखल झाले आहेत. औरंगाबादच्या दिशेने येत असताना राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा पुन्हा एकदा अपघात झाला आहे. यामध्ये १२ गाड्यांचे नुकसान झाले आहे. नगर जिल्ह्यातील घोडेगाव येथे आज दुपारी असाच अपघात घडला होता. त्यामध्ये दोन गाड्यांचे नुकसान झाले होते.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ताफ्यातील गाड्यांचा दुसरा अपघात घडला आहे. औरंगाबाद जवळील वाळूज येथे हा अपघात घडल्याची माहिती आहे. या अपघातात १२ गाड्यांच नुकसान झालं आहे. यामध्ये पुण्याचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची गाडी देखील असल्याची माहिती समोर आली आहे.

यापूर्वी आज दुपारी अहमदनगर येथील घोडेगाव येथे तीन गाड्या एकमेकांना पाठीमागून धडकल्या होत्या ज्यात केदार शिंदे आणि अंकुश चौधरी यांच्या गाडीचे नुकसान झाले होते. या दोन्ही अपघातात कुणी जखमी झाले नाही. वाळूज येथे घडलेल्या अपघातात एअर बॅग्समुळे कुणालाही दुखापत झाली नाही असं सांगण्यात आलं आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!