‘दावोस’मध्ये महाराष्ट्राचा डंका वाजला आहे. एकाच दिवशी तब्बल 4.99 लाख कोटींच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या आहेत. यातून 92 हजार 234 नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार झाला. एल मॉट कंपनी पायाभूत सुविधा क्षेत्रात सुमारे 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करणार असून यामुळे पुण्यात 5000 नव्या रोजगार प्रकल्पांची निर्मिती होणार आहे. ब्ल्यू एनर्जी मोटर्स ऑटोमोबाईल्स आणि ईव्ही क्षेत्रात 3,500 कोटींची पुण्यात गुंतवणूक करणार असून यातून चार हजार रोजगारांची निर्मिती होणार आहे. एच टू ई पॉवर कंपनी पुण्यात हरित ऊर्जा क्षेत्रात 10,750 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे 1,850 नवा रोजगार निर्मित होणार आहे.
कोणत्या क्षेत्रात, कोणत्या जिल्ह्यात, किती कोटींची होणार गुंतवणूक?
* कल्याणी उद्योग समूह संरक्षण, स्टील आणि एव्ही, 5200 कोटी रुपयांची गडचिरोलीत गुंतवणूक करणार आहे यामुळे 4000 नव्या रोजगारांची निर्मिती होणार आहे
* रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड संरक्षण क्षेत्रात रत्नागिरीत 16,500 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे 2,450 नवे रोजगार मिळणार आहेत
* बालासोवर आलॉय लिमिटेड स्टील आणि मेटल्स क्षेत्रात 17 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे 3200 नवे रोजगार निर्मित होणार आहेत
* विराज प्रोफाइल्स प्रायव्हेट लिमिटेड 12000 कोटी रुपयांची पालघरमध्ये स्टील आणि मेटल्स क्षेत्रात गुंतवणूक करणार असून यामुळे 3500 नवे रोजगार प्रकल्प निर्माण होणार आहेत
* एबी इनबेव छत्रपती संभाजीनगरमध्ये 750 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे 35 नवे रोजगार निर्माण होणार आहेत
* जेएसडब्ल्यू समूह नागपूर आणि गडचिरोली मध्ये तब्बल तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे दहा हजार नवे रोजगार प्रकल्प निर्माण होणार आहेत
* वारी एनर्जी या कंपनीकडून नागपूर मध्ये 30 हजार कोटी रुपयांची हरित ऊर्जा व सौर उपकरणे क्षेत्रात गुंतवणूक करणार असून यामुळे 7,500 नवे रोजगार प्रकल्प निर्माण होणार आहेत
* टेम्बो कंपनी संरक्षण क्षेत्रात रायगड मध्ये एक हजार कोटींची गुंतवणूक करणार असून यामुळे 399 रोजगार प्रकल्प निर्माण होणार
* एल मॉट कंपनी पायाभूत सुविधा क्षेत्रात सुमारे 2 हजार कोटी रुपयांची तरतूद करणार असून यामुळे पुण्यात 5000 नव्या रोजगार प्रकल्पांची निर्मिती होणार आहे
* ब्लॅकस्टोन कंपनी एमएमआर रीजनमध्ये 25 हजार कोटींची गुंतवणूक करणार असून यामुळे 1000 प्रकल्पांची निर्मिती होणार आहे
* ब्लॅक स्टोन आणि पंचशील रियालिटी डेटा सेंटर विषयात एमएमआर रिजनमध्येच 2 हजार कोटींची गुंतवणूक करणारा असून यामुळे 500 रोजगार प्रकल्प निर्माण होणार आहेत
* अवनी पावर बॅटरीज इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात 10 हजार 521 कोटींची छत्रपती संभाजी नगर मध्ये गुंतवणूक करणार असून यातून 5 हजार रोजगार प्रकल्प निर्माण होणार आहेत
* जेन्सोल कंपनी छत्रपती संभाजी नगर मध्येच इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रातच 4000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार असून यामुळे 500 नवे रोजगार निर्माण होणार आहेत
* बिसलरी इंटरनॅशनल एम एम आर रिझन मध्ये 250 कोटींची गुंतवणूक अन्न आणि पेय क्षेत्रात करणार असून यामुळे 600 नवे रोजगार महाराष्ट्रात निर्माण होणार आहेत.