महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाले यात महायुतीला मतदारांनी सुनामी बहुमत दिले. महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरे जावं लागलं. यामध्ये अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्यासही पाहायला मिळालं. तीवसा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या राज्यातील मोठ्या नेत्या यशोमती ठाकूर यांचा भाजपच्या राजेश वानखेडे यांनी धक्कादायक पराभव केला.
राज्यातील विधानसभा निवडणुकीत अनेक धक्कादायक निकाल लागले. प्रसारमाध्यमांनी आणि रिसर्च संस्थांनी जाहीर केलेले अनेक एक्झिट पोल हे या निकाला पुढे फोल ठरल्याचे दिसून आलं. बहुतांश सर्वच एक्झिट पोल मध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि महायुतीमध्ये अटीतटीची लढत होईल असं सांगण्यात आलं. परंतु निकाल जाहीर झाल्याच्या नंतर 288 मतदारसंघांपैकी महायुतीला 230 जागा तर महाविकास आघाडीला अवघ्या 46 जागा मिळाल्या तर इतरांना 12 जागा मिळाल्या. एक्झिट पोल मध्ये महाविकास आघाडी मधील अनेक मोठ्या नेत्यांना पराभवाचा धक्का सहन करावा लागला. त्यातील मोठं नाव म्हणजे अमरावतीतील काँग्रेसच्या नेत्या आणि राज्यातील मोठ नाव यशोमती ठाकूर यांचा दिवसात विधानसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाच्या राजेश वानखेडे यांनी 7617 मतांनी पराभव केला.राजेश वानखेडे यांना 99664 मते मिळाली. तर यशोमती ठाकूर यांना 92047 मते मिळाली. यशोमती ठाकूर सलग तीन वेळा तिवसा मतदारसंघातून निवडून आल्या होत्या. मात्र, त्यांची विजयी कामगिरी रोखण्यात भाजपला यश आलं.महाविकास आघाडी सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या ठाकूर अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्रीही होत्या. महायुती सरकारवर आक्रमकपणे टीका करणाऱ्या नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता.सलग तीनवेळा आमदार राहिलेल्या ठाकूर यांच्यावर मतदारसंघात कामं झालेली नसल्यानं मतदारांची नाराजी होती. तसंच अमरावती मतदारसंघात झालेल्या ध्रुवीकरणाचाही त्यांना फटका बसल्याचं सांगितलं जातं.राजेश वानखेडे हे मूळचे शिवसैनिक आहेत. त्यांनी काही वर्षांपूर्वी भाजपात प्रवेश केला होता. या विजयामुळे त्यांना उमेदवारी देऊन भाजपने योग्य निर्णय घेतला असल्याचे दिसून येते. यशोमती ठाकूर यांना अँटी इन्कबंसी मारक भोवल्याचे बोलले जात आहे.