HARIYANA ELECTION: लोकसभेत भाजपला बहुमतापासून रोखणाऱ्या काँग्रेसला हरियाणा का मिळवता आले नाही सत्ता? ही आहेत प्रमुख कारणं

142 0

देशात नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये तीनशे तीन वरून भाजपाला अवघ्या 240 जागांवर समाधान मानावं लागलं तर 2019 च्या निवडणुकीत 55 जागा मिळवणाऱ्या काँग्रेस पक्षाला 99 जागा मिळाल्या आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते पदही मिळालं.

लोकसभा निवडणुकीनंतर पार पडलेल्या हरियाणा, जम्मू काश्मीर विधानसभेच्या निवडणुकीचे निकाल आज अखेर जाहीर झाले. आणि या निवडणुकीत हरियाणात सत्तेत येण्याचं स्वप्न बघणाऱ्या काँग्रेसच्या पदरी मात्र निराशा आली.

हरियाणातील भाजपाच्या विजयाची प्रमुख कारण? 

  1. मुख्यमंत्री बदल: हरियाणा विधानसभा निवडणुकीला काही दिवस बाकी असतानाच हरियाणामध्ये  भाजपाने मुख्यमंत्री बदल करत मनोहरलाल खट्टर यांना मुख्यमंत्री पदावरून हटवलं. आणि नायबसिंग सैनी यांना मुख्यमंत्री केलं. हरियाणाच्या राजकारणावर चाट आणि ओबीसी राजकारणाचा मोठा प्रभाव असल्याचं पाहायला मिळतं आणि यामुळे नायबसिंग सैनी यांना मुख्यमंत्री केल्याचं बोललं जातंय.
  2. काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजी: काँग्रेस नेते भूपेंद्रसिंग हुडा आणि काँग्रेस नेत्या के. शैलजा यांच्यामधील अंतर्गत गटबाजी भाजपाच्या पथ्यावर पडल्याचं बोललं जात आहे. अशोक तंवर यांच्या परत येण्याचाही काँग्रेसला फायदा झाला नाही.
  3. भाजपाच्या लाभार्थी वर्गाला शोधता आला नाही पर्याय हरियाणा काँग्रेसला, भाजपच्या लाभार्थी वर्गाला पर्याच शोधता आला नाही. याशिवाय, कुस्तीपटू आणि शेतकऱ्यांचा मुद्दाही फारसा फायद्याचा ठरला नाही.
  4. नायबसिंग सैनी यांचा स्वच्छ कारभार: नायबसिंग सैनी सरकारने अतिशय अल्पावधीत सरकार चालविताना भाजपाच्या विरोधातील असंतोषाला कमी करण्याचे काम केले. लोकहिताचे निर्णय घेत सरकार सामान्यांच्या बाजूने असल्याचा विश्वास निर्माण केला.

 

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!