नमस्कार मी राजरत्न जोंधळे. टॉप न्यूज मराठीमध्ये आपले स्वागत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शरद पवार एक चांगलीच सक्रिय झाल्या असून, त्यांच्या पक्ष प्रवेशासाठी इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते रामराजे नाईक निंबाळकर हे आता शरद पवार गटात प्रवेश करण्याची शक्यता आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील फुटी नंतर झालेल्या लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात इच्छुकांची मोठी रांग लागली आहे. लोकसभा निवडणूक शरदचंद्र पवार पक्षाने लोकसभेच्या 10 जागा लढवल्या त्यापैकी पक्षाने आठ जागा जिंकल्या. पक्षाच्या फुटी नंतरही शरद पवारांनी आखलेल्या डावपेचांमुळे त्यांना हे यश मिळाल्याचे सांगितलं जातं. यशानंतर शरद पवार गटात जोरदार इनकमिंग सुरू झालेला असून, विधानसभेसाठी तुतारी चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली आहे. विधानसभा निवडणुकीतही पुतणे अजित पवारांना मोठा धक्का देण्यासाठी काका शरद पवार चांगलेच सक्रिय झाल्याचे दिसून येते. पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यातील कागल मध्ये समर्जीत घाटगे, यांनी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. त्यांच्या पाठोपाठ इंदापूर सीमाजी आमदार आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सुद्धा शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यानंतर महाराज बबनराव शिंदे आणि नगर मधील हे काही आमदार हे राष्ट्रवादीच्या वाटेवर असतानाच आता फलटण मधील आणि पश्चिम महाराष्ट्रातील बडे नेते रामराजे निंबाळकर आता अजित पवार यांची साथ सोडून शरद पवार यांच्या पक्षात जाण्याची शक्यता आहे. जर रामराजे निंबाळकर यांनी शरद पवार गटात प्रवेश केल्यास हा अजित पवार गटासाठी मोठा धक्का असणार आहे. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू होण्याआधीच शरद पवार हे महायुतीला धक्का देण्याच्या तयारीत आहेत. रामराजे निंबाळकर यांनी काय जाहीर सभेत बोलताना म्हणाले मी दोनवेळा शरद पवारांना भेटलो, अशा बातम्या सुरू आहेत पण ज्या माणसाने मी आमदार नसताना मला मंत्री केले आणि त्या माणसाला पक्षफुटीवेळी सोडून मी अजित पवार यांच्याकडे गेलो. कुठल्या तोंडाने मी त्यांना भेटू तुम्हीच सांगा? असे विधान रामराजे यांनी केले. त्यांच्या या केलेल्या विधानामुळे ते शरद पवार गटात जाण्यास इच्छुक असल्याच्या चर्चा सुरू झाल्यात.
पश्चिम महाराष्ट्रातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते रामराजे निंबाळकर यांच्या नाराज माणसं नेमकं कारण काय आहे पाहुयात.
माजी जलसंपदा मंत्री आणि विधानपरिषदेचे माजी सभापती रामराजे नाईक-निंबाळकर हे १९९५ ला आमदार झाले. तेव्हापासून २०१९ पर्यंत ते मंत्रिमंडळात होते. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर ते उपमुख्यमंत्री अजित पवारांबरोबर गेले. ” विधानपरिषदेचे सभापती असतानादेखील मला तुरूंगात टाकायची तयारी रणजितसिंह नाईक-निंबाळकर आणि आमदार जयकुमार गोरेंनी केली होती,” असा गौप्यस्फोट रामराजेंनी जाहीर सभेत केला. “ही बाब मी देवेंद्र फडणवीसांनाही सांगितली होती. अजित पवार गट महायुतीत सहभागी झाल्यानंतरही भाजपानं निंबाळकर, गोरेंना समज दिली नाही. त्यामुळे निंबाळकर आणि कार्यकर्ते नाराज आणि अस्वस्थ आहेत.”
लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाला मिळालेल्या घवघवीत यशानंतर शरद पवार गटात येण्यास अनेक जण इच्छुक आहेत. त्याचबरोबर आता रामराजे निंबाळकर यांनी जाहीर सभेत शरद पवारांनी मला आमदारचं,मंत्री केलं मी त्यांना सोडून अजित पवारांसोबत गेलो आता मी त्यांना कोणत्या तोंडाने भेटू? असे विधान केल्याने ती पुन्हा शरद पवार गटात जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.