नवाब मलिकांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली

469 0

नवी दिल्ली- महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचे सांगत दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना दणका बसला आहे.

महाविकास आघाडीचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या अडचणींमध्ये आणखी वाढ झाली आहे. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात नवाब मलिक यांना ईडीने अटक केली आहे. मात्र ही अटक बेकायदेशीर असल्याचं सांगत मलिकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आज सुप्रीम कोर्टाने ही याचिका फेटाळून लावली आहे. सध्या तपास सुरू असल्याने हस्तक्षेप करणं योग्य नाही असं कोर्टाने म्हटलं आहे.

यापूर्वी नवाब मलिक यांनी आपली अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल होती. मात्र उच्च न्यायालयाने देखील नवाब मलिकांची याचिका फेटाळून लावली होती.  केला

२३ फेब्रुवारीला मनी लाँड्रिंग प्रकरणाच्या आरोपाखाली नवाब मलिक यांना ईडीने अटक केली. यानंतर त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. ईडीने दाखल केलेले गुन्हे रद्द करण्याची मागणी त्यांनी याचिकेतून केली होती. त्यांच्या विरोधात जो गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्यात काही तथ्य नाही मात्र त्यांचा संबंध अंडरवर्ल्ड सोबत जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे, असाही दावा नवाब मालिकांच्या वकिलाने केला आहे.

Share This News

Leave a comment

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!