पुणे : काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत पक्षाच्या विलीनीकरणासंदर्भात वक्तव्य केले होते. त्यावर आता अजित पवार (Ajit Pawar) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. “शरद पवार यांच्या मनात असते तोच निर्णय ते घेत असतात. ते कुणाचं ऐकत नाहीत. त्यांना हवं तसं ते करतात.”, असे अजित पवार म्हणाले आहेत.
काय म्हणाले अजित पवार?
मी शरद पवारासांबोत फार जवळून काम केलंय. त्यांच्या कामाची पद्धत मला माहितीय. शरद पवार अनेकदा संभ्रमावस्था निर्माण करणारी विधाने करतात. उद्धव ठाकरे त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील असं वाटत नाही. शरद पवारांना ज्यावेळी निर्णय घ्यायचा असतो तेव्हा ते बाकीच्या सहकाऱ्यांना सांगतात आणि तो सामुहिक निर्णय असल्याचं दाखवतात असंही अजित पवार म्हणाले. अजित पवार यांनी पुढे म्हटलं की, आम्ही निर्णय घेतला तेव्हा ते एकटेच विरोध करत होते. त्यांना हवा तोच निर्णय ते घेतात आणि फक्त दाखवतात की तो निर्णय सामुहिक आणि चर्चा करून घेतला आहे. शरद पवार कुणाचंही ऐकत नाहीत, ते मनाला वाटेल ते करतात आणि त्यांचा तो स्वभाव बदलणं शक्य नाही.
बारामतीत भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांबाबत केलेल्या वक्तव्यावरही अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली. शरद पवारांचा पराभव करणं हे आमचं उद्दिष्ट असल्याचं चंद्रकांत पाटील म्हणाले होते. यावर अजित पवार यांनी म्हटलं की, चंद्रकांत पाटलांची चूक झाली हे मी मान्य करतो. त्यानंतर आम्ही त्यांना सांगितले तुम्ही बारामतीत येऊ नका. आम्ही पाहतो. त्यानंतर ते चुप आहेत.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Pune Crime : धक्कादायक ! पुण्यात 20 जणांच्या टोळक्यांकडून 2 तरुणावर जीवघेणा हल्ला